शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील उष्मांकामुळे फळ भाजी उत्पादनात झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 01:56 IST

वातावरणात उष्मा वाढल्यामुळे भाजी आणि आंबा फळ यावर उष्णतेमुळे परिणाम होऊन उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. सध्या वातावरणात चढलेला पारा हा जास्त कोकण विभागात जाणवत आहे आणि याचा त्रास मनुष्य, प्राणी यांच्यासह झाड, वेल यांनाही बसत आहे.

कार्लेखिंड : वातावरणात उष्मा वाढल्यामुळे भाजी आणि आंबा फळ यावर उष्णतेमुळे परिणाम होऊन उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. सध्या वातावरणात चढलेला पारा हा जास्त कोकण विभागात जाणवत आहे आणि याचा त्रास मनुष्य, प्राणी यांच्यासह झाड, वेल यांनाही बसत आहे.अलिबाग तालुक्यात रबी हंगामात आंबा, तोंडली, कारली, दुधीभोपळा, पडवळ, वाल आणि घेवडा आदी प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. मार्च एप्रिल, मे महिन्यात या भाज्यांचे उत्पादन भरपूर मिळते; परंतु गेल्या आठ दिवसांपासून अचानक वातावरणात उष्मा वाढल्याने त्याचा परिणाम शेतातील भाज्यांवर होऊ लागला आहे. दररोज ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असल्याने गरम वाफ मारत आहे. शेतातील पालेभाजी व वेली उष्म्यामुळे सुकून जात आहेत. सतत दोन वर्षे शेतकरी नुकसान सहन करीत आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या लाॅकडाऊनमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते आणि यावर्षी या उष्म्यामुळे शेती उत्पादन थांबून आर्थिक नुकसान होणार आहे. दरवर्षीच्या सरासरी उत्पादनापेक्षा यावर्षी ३० ते ४० टक्केच शेतमाल वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निर्यात होत आहे. अलिबाग तालुक्यात रबी हंगामात दरवर्षी खालील भाज्यांची अंदाजित लागवड व उत्पन्न घेतले जाते.

टॅग्स :MangoआंबाRaigadरायगड