शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

वातावरणातील उष्मांकामुळे फळ भाजी उत्पादनात झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 01:56 IST

वातावरणात उष्मा वाढल्यामुळे भाजी आणि आंबा फळ यावर उष्णतेमुळे परिणाम होऊन उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. सध्या वातावरणात चढलेला पारा हा जास्त कोकण विभागात जाणवत आहे आणि याचा त्रास मनुष्य, प्राणी यांच्यासह झाड, वेल यांनाही बसत आहे.

कार्लेखिंड : वातावरणात उष्मा वाढल्यामुळे भाजी आणि आंबा फळ यावर उष्णतेमुळे परिणाम होऊन उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. सध्या वातावरणात चढलेला पारा हा जास्त कोकण विभागात जाणवत आहे आणि याचा त्रास मनुष्य, प्राणी यांच्यासह झाड, वेल यांनाही बसत आहे.अलिबाग तालुक्यात रबी हंगामात आंबा, तोंडली, कारली, दुधीभोपळा, पडवळ, वाल आणि घेवडा आदी प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. मार्च एप्रिल, मे महिन्यात या भाज्यांचे उत्पादन भरपूर मिळते; परंतु गेल्या आठ दिवसांपासून अचानक वातावरणात उष्मा वाढल्याने त्याचा परिणाम शेतातील भाज्यांवर होऊ लागला आहे. दररोज ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असल्याने गरम वाफ मारत आहे. शेतातील पालेभाजी व वेली उष्म्यामुळे सुकून जात आहेत. सतत दोन वर्षे शेतकरी नुकसान सहन करीत आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या लाॅकडाऊनमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले होते आणि यावर्षी या उष्म्यामुळे शेती उत्पादन थांबून आर्थिक नुकसान होणार आहे. दरवर्षीच्या सरासरी उत्पादनापेक्षा यावर्षी ३० ते ४० टक्केच शेतमाल वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निर्यात होत आहे. अलिबाग तालुक्यात रबी हंगामात दरवर्षी खालील भाज्यांची अंदाजित लागवड व उत्पन्न घेतले जाते.

टॅग्स :MangoआंबाRaigadरायगड