शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

Atal Bihari Vajpayee : रायगड विकासाचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:27 IST

दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला संवर्धन व विकासासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चालना दिली होती. किल्ल्याला भेट देऊन निधीही मंजूर केला होता.

- नामदेव मोरेनवी मुंबई : दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला संवर्धन व विकासासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चालना दिली होती. किल्ल्याला भेट देऊन निधीही मंजूर केला होता. देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई विमानतळासाठी प्राथमिक तयारी त्यांच्या कार्यकाळात झाली. त्यांच्या निधनामुळे रायगडसह विमानतळ विकासाचे स्वप्न पाहणारे द्रष्टे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.१८ फेब्रुवारी २०१८ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात आली. या वेळी पंतप्रधानांनी विमानतळाच्या प्रवासावर दृष्टिक्षेप टाकला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण वाढू लागल्यामुळे १९९८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न पाहण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. वाजपेयी यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारू लागले आहे. भविष्याचा वेध घेऊन त्यांनी नवी मुंबई विमानतळासाठीची प्राथमिक तयारी सुरू केली होती. २००४ मध्ये वाजपेयी सरकार सत्तेवर असतानाच विमानतळासाठी सीआरझेड अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली होती व व नवी मुंबईमधील ग्रीनफिल्ड एअरपोर्टसाठी महत्त्वाची परवानगीही मिळाली होती. यामुळे नवी मुंबईमध्ये वाजपेयी प्रत्यक्षात महत्त्वाच्या प्रकल्पाच्या भूमिपूजन किंवा उद्घाटनासाठी आले नसले तरी विमानतळासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाची चाचपणी त्यांच्याच कार्यकाळात झाली होती. वाजपेयी यांनी पाहिलेल्या विमानतळाचे स्वप्न राज्यात व देशात भाजपाची सत्ता असतानाच प्रत्यक्ष साकार होऊ लागले असून, वेगाने विमानतळ उभारणीची कामे सुरू झाली आहेत.३ एप्रिल १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. या वेळी त्यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधीची घोषणाही केली होती. मराठा साम्राज्याचे प्रतीक असलेल्या या किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर भाजपाचीच सत्ता असताना रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०० कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील विमानतळ व दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या संवर्धनाचे स्वप्न पाहणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीRaigadरायगड