शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमधून फरार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:43 IST

सागर पाटील खून प्रकरण । २७ मेपर्यंत पोलीस कोठडीचे न्यायालयाचे आदेश

अलिबाग : कुरुळ येथील दत्त टेकडी परिसरात झालेल्या सागर पाटील खुन प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र प्रकाश मगर व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण या दोघांना गाणगापूर (कर्नाटक) येथे अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी जितेंद्र मगर यांचा मोठा भाऊ गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेंद्र मगर यांचे वडिलोपार्जित मिळकतीवरून वाद होते. आरोपी राजेंद्र याने त्याच्या कटात आरोपी नीलेश वाघमारे (रा. गोविंद बंदर, अलिबाग) व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण (रा. हवेली, पुणे) यांना सामील करून घेतले. १ एप्रिल रोजी मध्यरात्री जितेंद्र हे मित्रांसह कुरुळ-दत्तटेकडी येथून कुरुळ गावाकडे येत असताना, टेकडीच्या पायथ्याशी दबा धरून बसलेल्या तिघांनी गोळीबार करून सागर पाटील यांचा खून केला. तर यात गौरव चंद्रकांत भगत (रा. कुरुळ) यांस जखमी केले होते. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नीलेश दशरथ वाघमारे यास पकडण्यात पोलिसांना तत्काळ यश आले होते; परंतु राजेंद्र प्रकाश मगर व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण हे फरार झाले होते. या दोघांचा पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे शोध घेण्यात आला. हे दोघेही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नाव धारण करून वावरत होते. या तपासादरम्यान पथकास मिळालेल्या माहितीनुसार यातील या दोघा आरोपींना गाणगापूर (कर्नाटक) येथे मोठ्या अटक करण्यात आली. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व अलिबाग पोलीस यांच्या संयुक्त शोधपथकाने ही कारवाई के ल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांनी दिली आहे.दोघांनाही पोलीस कोठडीराजेंद्र मगर व समीर चव्हाण या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही २७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे हे करीत आहेत.