शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

शासनाविरोधात एपीएमसी कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 04:33 IST

बाजार समितीचे कार्यक्षेत्र फक्त मार्केट आवारापुरतेच मर्यादित करण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात अधिकारी व कर्मचा-यांनी निदर्शने केली.

नवी मुंबई  - बाजार समितीचे कार्यक्षेत्र फक्त मार्केट आवारापुरतेच मर्यादित करण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात अधिकारी व कर्मचा-यांनी निदर्शने केली. शासनाने चुकीचा अध्यादेश मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.शासनाने आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अध्यादेश काढून बाजार समितीचे कार्यक्षेत्र फक्त मार्केट आवारापुरते मर्यादित केले आहे. यामुळे मुंबई बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. धान्य व मसाला मार्केटमधील व्यापारी मार्केटबाहेर साठा करण्याची शक्यता असून माथाडी कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. बाजार समितीच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना वेतन देणेही शक्य होणार नाही. यामुळे संतापलेल्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने बाजार समितीच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही कर्मचाºयांच्या लढ्यास पाठिंबा दिला. बाजार समिती कर्मचारी व माथाडी कामगारांच्या हिताला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांनीही सरकारच्या धोरणामुळे बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. सरकारने घेतलेला चुकीचा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी दिला. निदर्शनामध्ये बाजार समितीमधील बहुतांश सर्व अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले होते. माथाडी संघटनाही शासनाच्या निर्णयाच्याविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. शिवसेनाप्रणित अधिकारी व कर्मचारी संघटनेनेही पत्र देवून शासनाने बाजार समितीमधील कर्मचाºयांना शासन सेवेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.बाजार समितीमधील आंदोलनामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ, सहसचिव अविनाश देशपांडे, अधीक्षक अभियंता व्ही. बी. बिरादार, मिलिंद सूर्याराव,रफीक इनामदार, कर्मचारी सेनेचे अध्यक्ष नारायण महाजन व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई