शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

भरत गोगावलेंना डावलल्याने नाराजी; रायगडमध्ये शिवसैनिक राजीनाम्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:35 IST

हॅट्ट्रिक करूनही मंत्रिमंडळात स्थान नाही

दीपक साळुंखे बिरवाडी : महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांचा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्याने जिल्ह्यामधील सामान्य शिवसैनिक नाराज झाला आहे. गोगावले यांना मंत्रिपद द्या, या मागणीकरिता शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपला राजीनामा थेट मातोश्रीवर पाठविण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन आमदार, १८ जिल्हा परिषद सदस्य, अनेक नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती व अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या समीकरणांमध्ये रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेले असल्याने तसेच तीन वेळा निवडून आलेले आमदार भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने सामान्य शिवसैनिक नाराज आहेत. शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये ही नाराजी व्यक्त करण्यात आली. सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आपले राजीनामे मातोश्रीवर पाठवणार आहेत. या बैठकीसंदर्भात कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या नाराजीची दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगडमधील शिवसेना संघटनेला न्याय देणार का? की पुन्हा रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात फक्त सुनील तटकरेंचा दबदबा कायम राहणार, अशी चर्चा सध्या आहे.

जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांनी मोठा संघर्ष करून विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद वाढविली आहे. यामध्ये अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी विजय संपादन करून शिवसेना संघटनेला नवीन उभारी दिली. तर महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी विजयी हॅट्ट्रिक केल्याने पक्षनेतृत्व रायगडला मंत्रिपदाचा मान देतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बदललेल्या राजकीय गणितांचा फटका जिल्ह्यामधील शिवसेना संघटनेला अधिक बसल्याची भावना सामान्य शिवसैनिकांमध्ये तयार झाली आहे.ग्रामपंचायत ते थेट लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना संघटनेचे काम करून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना पक्षाकडूनच न्याय दिला जाणार नसेल तर मातोश्रीवर राजीनामा पाठवून लक्ष वेधण्याचा निर्धार शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष यांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करून निवडून आलेले आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयामुळे शिवसेनेची ताकद रायगड जिल्ह्यामध्ये वाढलेली असताना पक्ष नेतृत्वाने रायगड जिल्ह्याकडे पाठ फिरवत मंत्रिमंडळात रायगडचे आमदार भरत गोगावले यांना स्थान न दिल्याने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे रायगडमध्येही शिवसेना पक्षात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस