शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

ताई, माई, आक्का...च्या घोषणा झाल्या विरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 23:38 IST

निवडणूक प्रचाराचा बदलता फंडा : उमेदवारांकडून समाजमाध्यमांचा वापर

विनोद भोईर ।लोकमत न्यूज नेटवर्कपाली : निवडणूक म्हटले की प्रचार आला आणि प्रचार म्हटले की घोषणा आल्या. मागे वळून पाहिल्यास घसा दुखेसतोवर उमेदवाराच्या नावाने मत मागणारे कार्यकर्ते घोषणा देताना डोळ्यासमोर उभे राहतात. जीप किंवा ट्रक, टेम्पोतून फिरणारे कार्यकर्ते, गाडीला लावलेला पक्षाचा झेंडा आणि तत्कालीन ठेवणीतल्या घोषणांनी निवडणुकीची वेगळी वातावरण निर्मिती व्हायची. आता प्रचाराची पद्धत बदलली आहे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव स्पष्ट दिसत आहे.

लोकशाहीत निवडणुकांना फार मोठे महत्त्व आहे. आपला नेता कोण आणि कसा असावा? याची निवड करण्याचा पूर्ण अधिकार मतदाराला आहे. त्यामुळे या मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते निवडणूक काळात सतत मतदारांशी संवाद साधत असतात. त्यासाठी मोठमोठ्या सभा आयोजित केल्या जातात.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. रायगडात सात जागांसाठी निवडणूक होत आहे. पेणमध्ये मुख्यमंत्र्यांची झालेली सभा वगळता जिल्ह्यात फार मोठ्या सभा घेतल्याचे पाहावयास मिळत नाहीत. मागे वळून पाहताना अगदी सन २००० पर्यंतच्या काळात झालेल्या निवडणुका या अधिकच प्रचाराच्या दृष्टीने लक्षात राहणाऱ्या आहेत. ‘येऊन, येऊन येणार कोण...आहेच कोण किंवा ताई, माई, आक्का.... मारा शिक्का’, अशा काही घोषणांनी गाव, शहर, गल्ली जागे करणारा तो प्रचार होता.घोषणांचे आवाज कानावर पडताच लहान, थोर सारेच कुतूहलाने घरातून बाहेर यायचे. एक वेगळीच वातावरण निर्मिती केली जातहोती.मतदारांपर्यंत पोहोचण्याची पद्धत बदललीच्निवडणूक गाव पातळीवरची असो वा राज्य, केंद्र स्तरावरील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेणे ही जुनी परंपरा आहे. २५ ते ३० वर्षांपूर्वी पक्षीय कार्यकर्ते गावातील तरुणांशी संवाद साधत त्यांच्या इच्छा, अपेक्षा जाणून घेत त्या तरुणांकडूनही क्रिकेटचे किट, व्हॉलीबॉल किट तत्सम काही अपेक्षा व्यक्त होत. आता याची जागा पार्ट्यांनी घेतली. गावागावांतून महिला, पुरुषांच्या सहली काढल्या जाऊ लागल्या. जशी मतदारापर्यंतपोहोचण्याची पद्धत बदलली, तशाच मतदारांच्या अपेक्षाही बदलल्या. एकूणच निवडणूक प्रचाराचा फंडाच बदलल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.फिरता, धावता प्रचार पडला मागेच्काळ बदलला प्रचाराचा वेग वाढला आणि त्याबरोबरच प्रचाराची पद्धतही बदलली. प्रसारमाध्यमांची संख्या वाढली. बातम्यांचे खासगी चॅनल्स निर्माण झाले. त्यात समाज माध्यमांनी तर सर्वांनाच प्रभावित केले.च्फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारखी माध्यमे हाताच्या बोटावर खेळवता येत असल्याने फार कष्ट न घेता मतदारांपर्यंत पोहोचता येते. व्हिडीओ, मेसेज, बॅनर यांच्या माध्यमातून प्रभावीपणे आपले म्हणणे मतदारांपर्यंत पोहोचवता येत आहे.च्त्यामुळे या माध्यमांचा वापर करण्याकडे उमेदवारांचा कल वाढत आहे. बघता बघता फिरता धावता प्रचार मागे पडला. आता क्वचितच प्रचाराच्या घोषणा कानावर पडतात.