शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

आंग्रे समाधी स्थळ सुशोभीकरणात खोडा, पुरातत्त्व विभागाने केले प्रश्न उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 12:25 IST

अडीच महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे हे काम ठप्प आहे. उपस्थित केलेल्या प्रश्नाचे निरसन करून पुढील काम सुरू होईल, असे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी म्हटले आहे. 

अलिबाग : स्वराज्यातील आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे अलिबाग शहरात समाधीस्थळ आहे. आंग्रे यांच्या समाधीस्थळ परिसराचे सुशोभीकरण काम अलिबाग नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू होते. या कामाबाबत पुरातत्त्व विभागाने काही प्रश्न उपस्थित केल्यामुळे हे काम थांबवले आहे. अडीच महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे हे काम ठप्प आहे. उपस्थित केलेल्या प्रश्नाचे निरसन करून पुढील काम सुरू होईल, असे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी म्हटले आहे. 

 २१ जानेवारीला राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे, आ. महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या उपस्थितीत आंग्रे यांच्या समाधीस्थळ परिसर सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला होता. संरक्षक भिंत आणि आरमारी नौकेची प्रतिकृती उभारणीचे काम हाती घेतले होते. प्रादेशिक पर्यटन योजनेतून दोन कोटी सुशोभीकरण कामासाठी मंजूर झाले आहेत. अजून तीन कोटी निधीची गरज असून, पाच कोटी रुपये खर्च होणार आहे. 

पर्यटनाच्या दृष्टीने आंग्रे समाधी स्थळ दुर्लक्षितअलिबाग हा पर्यटनासाठी उत्तम तालुका आहे. मात्र, अलिबागमध्ये येणारे बहुतांश पर्यटक हे समुद्र पर्यटन करून माघारी फिरतात. मात्र सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्थळाला भेट देत नाहीत. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ दुर्लक्षित राहिले आहे. आंग्रे समाधी स्थळालाही पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी, यासाठी परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र, त्याला पुरातत्व विभागाने खोडा घातला आहे. 

ही कामे होती सुरूसमाधीस्थळ उद्यानाच्या प्रवेशद्वारावर भव्य गलबताच्या प्रतिकृतीची उभारणी करणे, किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणे, दीपमाळांची उभारणी करणे, कान्होजी राजे आंग्रे यांच्या जीवनावरील म्यूरल्स तयार करणे यासाठी लागणारी आवश्यक बांधकामे ही कामे या योजनेअंतर्गत केली जाणार आहेत. जानेवारीत या कामाला सुरुवात केली होती. त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया, तांत्रिक मान्यताही प्राप्त झाल्या. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर आंग्रे समाधी स्थळाकडे पर्यटकही आकर्षित होतील. मात्र पुरातत्व विभागाने काही प्रश्न उपस्थित केल्याने हे काम थांबविले आहे.   

सरखेल कान्होजी आंग्रे समाधी स्थळाचे सुशोभीकरण काम सुरू झाले होते. पुरातत्व विभागाने काही कामांच्या बाबतीत शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे काम थांबले आहे. पुरातत्व विभागाच्या शंकाचे निरसन केले जात आहे. लवकरच काम पुन्हा सुरू होईल. -अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगर परिषद

टॅग्स :Raigadरायगड