शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आंग्रे घराण्याचे कुलदैवत तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:43 IST

तपोभूमी म्हणून प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे अनेक ऋ षीमुनी व शिवभक्तांनी तपश्चर्या केली असल्याने या शिव देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : तपोभूमी म्हणून प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे अनेक ऋ षीमुनी व शिवभक्तांनी तपश्चर्या केली असल्याने या शिव देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कनकेश्वरच्या निसर्ग रमणीय देवराईत परमेश्वराचे अस्तित्व असल्याची दृढ श्रद्धा आहे. अत्यंत प्राचीन अशा या कनकेश्वर देवस्थानास पौराणिक पार्श्वभूमी देखील आहे. कनकेश्वर हे एक अतिप्राचीन स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. कनकेश्वराचे दर्शन घेतल्याने त्रिभुवनांतील शिवलिंगाचे दर्शन केल्याचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. दर श्रावणी सोमवारी भाविकांची येथे मोठी गर्दी असते.कनकेश्वराच्या दर्शनासाठी जाण्याकरिता पायथ्याच्या मापगाव या गावातून ७५० पायºया चढून जावे लागते. सरखेल राघोजीराजे आंग्रे यांचे तत्कालीन दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकाने सन १७६४ मध्ये या पायºया व मंदिरासमोरील पुष्करणीचे बांधकाम स्वखर्चाने केले. या ७५० पायºयांमध्ये देवाची एक पायरी आहे. देवाने काम पाहावे, या गोविंद रेवादास त्यांच्या इच्छेनुसार देवाने काम पाहून येथे पावलाचा ठसा उमटवला आहे,अशी आख्यायिका येथे आहे. या पर्वतावर अनेक देवतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्याचे कुलदैवत आहे. पूर्वी देवस्थानची व्यवस्था आंग्रे सरकारकडून होत असे.मंदिराच्या सभोवतालचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील देवराईचे उत्पन्न हे कनकेश्वर देवस्थानकरिता वापरले जात असे. सरकारी दप्तरी हा डोंगर ‘देवाच्या’ नावे नोंदलेला आहे. राघोजी आंग्रे यांनी सवाई माधवराव पेशव्यांकडून इ.स.१७७६ मध्ये पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे कार्तिकातील त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारी कनकेश्वराची यात्राअसते.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कनकेश्वराच्या दोन दंतकथा आहेत. या तपोभूमीवर कनकासुर नावाच्या राक्षसाने शिवदर्शनार्थ उग्र तपश्चर्या केल्यामुळे शंकरमहादेवांनी प्रसन्न होऊन त्यास दोन वर दिले. त्यांनी मागितलेल्या वराप्रमाणे कनकासुर व शंकराचे युद्ध झाले. त्यातील त्या राक्षसाचे सामर्थ्य पाहून शंकराने पुन्हा प्रसन्न होऊन राक्षसाला उद्धार होईल असा दुसरा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे कनकासुराने त्याचे व देवाचे दोघांचेही वास्तव्य या डोंगरावर कायमचे राहावे असा वर मागितला. त्यांच्या सिद्धतेकरिता शंकराने राक्षसाला पालथे झोपण्यास सांगून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासुर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली. तेव्हापासून या स्थानाला कनकेश्वर हे नाव प्राप्त झाले.