शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

आंग्रे घराण्याचे कुलदैवत तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:43 IST

तपोभूमी म्हणून प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे अनेक ऋ षीमुनी व शिवभक्तांनी तपश्चर्या केली असल्याने या शिव देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : तपोभूमी म्हणून प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे अनेक ऋ षीमुनी व शिवभक्तांनी तपश्चर्या केली असल्याने या शिव देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कनकेश्वरच्या निसर्ग रमणीय देवराईत परमेश्वराचे अस्तित्व असल्याची दृढ श्रद्धा आहे. अत्यंत प्राचीन अशा या कनकेश्वर देवस्थानास पौराणिक पार्श्वभूमी देखील आहे. कनकेश्वर हे एक अतिप्राचीन स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. कनकेश्वराचे दर्शन घेतल्याने त्रिभुवनांतील शिवलिंगाचे दर्शन केल्याचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. दर श्रावणी सोमवारी भाविकांची येथे मोठी गर्दी असते.कनकेश्वराच्या दर्शनासाठी जाण्याकरिता पायथ्याच्या मापगाव या गावातून ७५० पायºया चढून जावे लागते. सरखेल राघोजीराजे आंग्रे यांचे तत्कालीन दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकाने सन १७६४ मध्ये या पायºया व मंदिरासमोरील पुष्करणीचे बांधकाम स्वखर्चाने केले. या ७५० पायºयांमध्ये देवाची एक पायरी आहे. देवाने काम पाहावे, या गोविंद रेवादास त्यांच्या इच्छेनुसार देवाने काम पाहून येथे पावलाचा ठसा उमटवला आहे,अशी आख्यायिका येथे आहे. या पर्वतावर अनेक देवतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्याचे कुलदैवत आहे. पूर्वी देवस्थानची व्यवस्था आंग्रे सरकारकडून होत असे.मंदिराच्या सभोवतालचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील देवराईचे उत्पन्न हे कनकेश्वर देवस्थानकरिता वापरले जात असे. सरकारी दप्तरी हा डोंगर ‘देवाच्या’ नावे नोंदलेला आहे. राघोजी आंग्रे यांनी सवाई माधवराव पेशव्यांकडून इ.स.१७७६ मध्ये पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे कार्तिकातील त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारी कनकेश्वराची यात्राअसते.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कनकेश्वराच्या दोन दंतकथा आहेत. या तपोभूमीवर कनकासुर नावाच्या राक्षसाने शिवदर्शनार्थ उग्र तपश्चर्या केल्यामुळे शंकरमहादेवांनी प्रसन्न होऊन त्यास दोन वर दिले. त्यांनी मागितलेल्या वराप्रमाणे कनकासुर व शंकराचे युद्ध झाले. त्यातील त्या राक्षसाचे सामर्थ्य पाहून शंकराने पुन्हा प्रसन्न होऊन राक्षसाला उद्धार होईल असा दुसरा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे कनकासुराने त्याचे व देवाचे दोघांचेही वास्तव्य या डोंगरावर कायमचे राहावे असा वर मागितला. त्यांच्या सिद्धतेकरिता शंकराने राक्षसाला पालथे झोपण्यास सांगून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासुर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली. तेव्हापासून या स्थानाला कनकेश्वर हे नाव प्राप्त झाले.