शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

आंग्रे घराण्याचे कुलदैवत तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:43 IST

तपोभूमी म्हणून प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे अनेक ऋ षीमुनी व शिवभक्तांनी तपश्चर्या केली असल्याने या शिव देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : तपोभूमी म्हणून प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे अनेक ऋ षीमुनी व शिवभक्तांनी तपश्चर्या केली असल्याने या शिव देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कनकेश्वरच्या निसर्ग रमणीय देवराईत परमेश्वराचे अस्तित्व असल्याची दृढ श्रद्धा आहे. अत्यंत प्राचीन अशा या कनकेश्वर देवस्थानास पौराणिक पार्श्वभूमी देखील आहे. कनकेश्वर हे एक अतिप्राचीन स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. कनकेश्वराचे दर्शन घेतल्याने त्रिभुवनांतील शिवलिंगाचे दर्शन केल्याचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. दर श्रावणी सोमवारी भाविकांची येथे मोठी गर्दी असते.कनकेश्वराच्या दर्शनासाठी जाण्याकरिता पायथ्याच्या मापगाव या गावातून ७५० पायºया चढून जावे लागते. सरखेल राघोजीराजे आंग्रे यांचे तत्कालीन दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकाने सन १७६४ मध्ये या पायºया व मंदिरासमोरील पुष्करणीचे बांधकाम स्वखर्चाने केले. या ७५० पायºयांमध्ये देवाची एक पायरी आहे. देवाने काम पाहावे, या गोविंद रेवादास त्यांच्या इच्छेनुसार देवाने काम पाहून येथे पावलाचा ठसा उमटवला आहे,अशी आख्यायिका येथे आहे. या पर्वतावर अनेक देवतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्याचे कुलदैवत आहे. पूर्वी देवस्थानची व्यवस्था आंग्रे सरकारकडून होत असे.मंदिराच्या सभोवतालचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील देवराईचे उत्पन्न हे कनकेश्वर देवस्थानकरिता वापरले जात असे. सरकारी दप्तरी हा डोंगर ‘देवाच्या’ नावे नोंदलेला आहे. राघोजी आंग्रे यांनी सवाई माधवराव पेशव्यांकडून इ.स.१७७६ मध्ये पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे कार्तिकातील त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारी कनकेश्वराची यात्राअसते.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कनकेश्वराच्या दोन दंतकथा आहेत. या तपोभूमीवर कनकासुर नावाच्या राक्षसाने शिवदर्शनार्थ उग्र तपश्चर्या केल्यामुळे शंकरमहादेवांनी प्रसन्न होऊन त्यास दोन वर दिले. त्यांनी मागितलेल्या वराप्रमाणे कनकासुर व शंकराचे युद्ध झाले. त्यातील त्या राक्षसाचे सामर्थ्य पाहून शंकराने पुन्हा प्रसन्न होऊन राक्षसाला उद्धार होईल असा दुसरा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे कनकासुराने त्याचे व देवाचे दोघांचेही वास्तव्य या डोंगरावर कायमचे राहावे असा वर मागितला. त्यांच्या सिद्धतेकरिता शंकराने राक्षसाला पालथे झोपण्यास सांगून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासुर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली. तेव्हापासून या स्थानाला कनकेश्वर हे नाव प्राप्त झाले.