शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

महाड तालुक्यातील अंगणवाड्या धोक्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 23:43 IST

भरतीला स्थगिती; १६ अंगणवाडी सेविका, २३ मदतनिसांची पदे रिक्त

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यात अंगणवाडी सेविकांची १६ पदे रिक्त असून अंगणवाडीवर लागणाऱ्या मदतनिसांच्या देखील २३ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे महाडमधील अंगणवाड्या धोक्यात आल्या आहेत. तालुक्यातील काही गावांत अंगणवाडी सेविकांच्या शैक्षणिक पात्रतेच्या अटीतील उमेदवार मिळत नसल्याने काही अंगणवाड्या मंजूर असूनदेखील सुरू झालेल्या नाहीत.ग्रामीण भागातील तरुणांच्या स्थलांतरामुळे गावे ओस पडू लागली आहेत. याचा परिणाम गावातील शाळा आणि अंगणवाड्यांवर होत आहे. यामुळे महाडच्या अनेक अंगणवाड्यांवर बालकांची संख्या घटत चालली आहे. गावातील तरु ण वर्ग मोठ्या प्रमाणावर नोकरी आणि व्यवसायासाठी शहरात गेले असून त्याच ठिकाणी स्थायिकदेखील झाले आहेत. शिवाय, शहरामध्ये प्ले हाउस, नर्सरीसारखे नवे प्रयोग आल्याने नागरिकांमध्ये याची क्रे झ वाढली आहे. यामुळे शासकीय अंगणवाड्यांवर विविध सुविधा उपलब्ध असताना देखील ओस पडत आहेत. येथे प्रवेश घेणाºयांची संख्या प्रत्येक वर्षाला घटत आहे.पोषण आहार, मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे, मुलांना खेळण्यासाठी खेळणी, बालकांच्या मातांची आरोग्य तपासणी आदी सुविधा या ठिकाणी मिळतात, तरी देखील प्ले हाउसच्या हौसेमुळे या बालकांना अल्प वयातच कठीण शिक्षणाची पायरी पालक चढवत आहेत.तालुक्यातील जिते तेरडेवाडी, गारपाटले, गोंडाळे कुडवेवाडी येथे अंगणवाडी मंजूर आहेत. मात्र, २१ ते ३० वयोगटातील महिला किंवा मुली १० वी पास शिक्षण घेतलेल्या मिळत नाहीत. वर्षभरापूर्वी याबाबत जाहिरात प्रसिद्ध करूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याचे महिला बाल कल्याण विकास प्रकल्पाकडून माहिती देण्यात आली. त्यातच महिला बालकल्याण विभागाकडून २०१७ मध्ये अंगणवाडी सेविका पदांच्या भरतीबाबत स्थगिती आदेश देण्यात आला आहे, यामुळे ही पदे रिक्त राहिली आहेत.कमी पटसंख्या कारणीभूतमहाड तालुक्यात जवळपास २० अंगणवाड्या कमी पट संख्येत आहेत. किमान १० च्या आत असलेल्या या अंगणवाड्या आहेत. यामुळे भविष्यात या अंगणवाड्या बंद पडण्याची शक्यता आहे.महाड तालुक्यात मिनी अंगणवाड्यांवर १६ सेविकांची पदे रिक्त आहेत, तर अंगणवाडी सेविकांची १० पदे, मदतनिसांच्या २३ जागा रिक्त आहेत. ग्रामीण भागातील स्थलांतरामुळे शिक्षण घेतलेल्या मुली किंवा महिला मिळणे कठीण झाले आहे.अंगणवाड्या बंद पडण्याची शक्यतारिक्त पदांची संख्या आणि ग्रामीण भागातील स्थलांतर यामुळे गावातील अंगणवाड्या ओस पडू लागल्या आहेत. भविष्यात अंगणवाडी बंद पडणे ग्रामीण भागाला धोकादायक आहे. ग्रामीण भागात दिल्या जाणाºया सुविधा, आरोग्य तपासणी, लसीकरण, जनगणना आदी शासकीय कामातदेखील अंगणवाडी सेविकांचे योगदान असते, यामुळे ग्रामीण भागात अंगणवाडी सुरू राहणे महत्त्वाचे आहे.महाड तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त आहेत. याबाबत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, काही गावांत शैक्षणिक अट असलेल्या महिला उपलब्ध न झाल्याने अंगणवाडी सुरू करता आल्या नाहीत तर महिला बाल कल्याण विभागाकडून नवीन भरतीबाबत स्थगितीदेखील आहे.- राजेश्री बने, बाल विकास प्रकल्प अधिकारी, महाड