शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

...आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून गाठले दरडग्रस्त गाव, १५० ग्रामस्थांना हलवले सुरक्षित ठिकाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 03:04 IST

गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता, तर काही डोंगराला भेगा पडल्याने डोंगरावर राहणारे नागरिक भयभीत झाले होते.

- आविष्कार देसाईअलिबाग : गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता, तर काही डोंगराला भेगा पडल्याने डोंगरावर राहणारे नागरिक भयभीत झाले होते. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेल की नाही याची त्यांना शाश्वती नव्हती, कारण त्यांच्यापर्यंत चारचाकी वाहन पोहोचू शकणार नव्हते. त्याच वेळी जिल्हाधिकारी थेट मोटारसायकलवरून अलिबाग तालुक्यातील खानाव-वेलटवाडी येथे शनिवारी पोहोचले. जिल्हाधिकारीच आल्याने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झाला.वेलटवाडी हे गाव डोंगरावर असल्याने गाडी जाणार नाही हे लक्षात येताच जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी मोटारसायकल आहे का अशी विचारणा केली. माजी सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी मोटारसायकलची व्यवस्था केली. जिल्हाधिकारी हे गोंधळी यांच्याच मोटारसायकलवर बसून डोंगराकडे जाण्यास निघाले. तालुक्यातील रेकॉर्डब्रेक पावसामुळे खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. त्या वेळी घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, खानावचे माजी सरपंच जितेंद्र गोंधळी, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, महसूल कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन वस्तीवरील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे १५० नागरिकांना सुरक्षितपणे डोंगराच्या खाली खानाव गावात आणून खानाव प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाचे सभागृह तसेच खानाव बाजार येथे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आपदग्रस्त गावाची पाहणी करून स्थानिक ग्रामस्थ, खानाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी व माजी सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांना सुरक्षित जीवन जगता यावे याबाबत सरकारने मदत करावी, अशी विनंती केली. जिल्हाधिकारी यांनी डोंगराच्या खाली नवीन गावठाण केले तर तुमची राहायची तयारी आहे का अशी विचारणा केल्यावर ग्रामस्थांनी त्यास सहमती दर्शविली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी नवीन गावठाण तयार झाल्यावर पुन्हा डोंगरावर रहायला तर जाणार नाही ना असा सवालही केला, परंतु ग्रामस्थांनी पुन्हा डोंगरावर जाणार नसल्याचे सांगितले.माझ्या जिल्ह्यातील नागरिक जीव धोक्यात घालून राहणार नाही. आपत्ती कधीच सांगून येत नाही. वेलटवाडी येथील नागरिकांना गावठाण जमीन देऊन तेथे त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत पालक मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे, तसेच लवकरच प्रस्ताव तयार करून यावर निर्णय घेण्यात येईल, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घरे देण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करण्यास जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी दरडप्रवण क्षेत्र आहेत. याबाबत जिओग्राफिकल सर्व्हे नेमका काय आहे याची वाट पाहत आहोत. - रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगड

टॅग्स :Raigadरायगड