शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून गाठले दरडग्रस्त गाव, १५० ग्रामस्थांना हलवले सुरक्षित ठिकाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 03:04 IST

गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता, तर काही डोंगराला भेगा पडल्याने डोंगरावर राहणारे नागरिक भयभीत झाले होते.

- आविष्कार देसाईअलिबाग : गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता, तर काही डोंगराला भेगा पडल्याने डोंगरावर राहणारे नागरिक भयभीत झाले होते. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेल की नाही याची त्यांना शाश्वती नव्हती, कारण त्यांच्यापर्यंत चारचाकी वाहन पोहोचू शकणार नव्हते. त्याच वेळी जिल्हाधिकारी थेट मोटारसायकलवरून अलिबाग तालुक्यातील खानाव-वेलटवाडी येथे शनिवारी पोहोचले. जिल्हाधिकारीच आल्याने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झाला.वेलटवाडी हे गाव डोंगरावर असल्याने गाडी जाणार नाही हे लक्षात येताच जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी मोटारसायकल आहे का अशी विचारणा केली. माजी सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी मोटारसायकलची व्यवस्था केली. जिल्हाधिकारी हे गोंधळी यांच्याच मोटारसायकलवर बसून डोंगराकडे जाण्यास निघाले. तालुक्यातील रेकॉर्डब्रेक पावसामुळे खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. त्या वेळी घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, खानावचे माजी सरपंच जितेंद्र गोंधळी, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, महसूल कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन वस्तीवरील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे १५० नागरिकांना सुरक्षितपणे डोंगराच्या खाली खानाव गावात आणून खानाव प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाचे सभागृह तसेच खानाव बाजार येथे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आपदग्रस्त गावाची पाहणी करून स्थानिक ग्रामस्थ, खानाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी व माजी सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांना सुरक्षित जीवन जगता यावे याबाबत सरकारने मदत करावी, अशी विनंती केली. जिल्हाधिकारी यांनी डोंगराच्या खाली नवीन गावठाण केले तर तुमची राहायची तयारी आहे का अशी विचारणा केल्यावर ग्रामस्थांनी त्यास सहमती दर्शविली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी नवीन गावठाण तयार झाल्यावर पुन्हा डोंगरावर रहायला तर जाणार नाही ना असा सवालही केला, परंतु ग्रामस्थांनी पुन्हा डोंगरावर जाणार नसल्याचे सांगितले.माझ्या जिल्ह्यातील नागरिक जीव धोक्यात घालून राहणार नाही. आपत्ती कधीच सांगून येत नाही. वेलटवाडी येथील नागरिकांना गावठाण जमीन देऊन तेथे त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत पालक मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे, तसेच लवकरच प्रस्ताव तयार करून यावर निर्णय घेण्यात येईल, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घरे देण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करण्यास जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी दरडप्रवण क्षेत्र आहेत. याबाबत जिओग्राफिकल सर्व्हे नेमका काय आहे याची वाट पाहत आहोत. - रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगड

टॅग्स :Raigadरायगड