शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

आंबेत, दादली पुलाची दुरुस्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:44 PM

संडे अँकर । कामगार, निधीचा अभाव : पावसाळ्यात धोका कायम

सिकंदर अनवारे ।लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : महाड आणि माणगाव हद्दीतील सावित्री नदीवरील तिन्ही मोठ्या पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र लॉकडाउनमुळे दुरुस्तीचे काम रखडले आहे. यामुळे पावसाळ्यात या तिन्ही पुलांचा धोका कायम राहिला आहे.तिन्ही पूल १९८० च्या दशकात बांधण्यात आले असून सावित्री पूल दुर्घटनेनंतर पुलांचे निरीक्षण करण्यात आले होते. यामध्ये पुलांची पाया दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले होते. तर आंबेत आणि टोळ या दोन्ही पुलांचे बेअरिंग बदलण्यासाठी पूल उचलले जाणार आहेत. मात्र कामगार, निधीचा अभावामुळे काम रखडले आहे.महाड जवळील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये वाहून गेला. या दुर्घटनेत मनुष्यहानीही झाली. यानंतर संपूर्ण देशभरात याचे पडसाद उमटले. शासनाने जुन्या पुलांचे निरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाडनजीक १९८० मध्ये बांधण्यात आलेले दादली, टोळ, भावे, बिरवाडी आणि माणगावमधील आंबेत पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये टोळ, आंबेत आणि दादली या पुलांचे पाण्याखालील भागाचे निरीक्षण आणि तपासणी केल्यानंतर पुलांच्या पायाला दुरुस्तीची गरज असल्याचे निरीक्षण करणाऱ्या एजन्सीकडून सुचवण्यात आले.आंबेत पुलाकरिता साडेनऊ कोटी, टोळ पुलाकरिता अडीच कोटी, तर दादली पुलाकरिता साडेसहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तिन्ही पुलांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल सावित्री नदीवरील मोठे पूल आहेत. शिवाय हे तिन्ही पूल रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारे आहेत. यामुळे पुलांना विशेष महत्त्व आहे. पुलांवरून सातत्याने अवजड वाहनांची आणि प्रवासी वाहनांची वर्दळ असल्याने त्यांची दुरुस्ती प्राधान्याने करणे आवश्यक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे.आंबेत पुलावरील कठड्याची दुरुस्ती केली जात असून यादरम्यान या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही सर्व वाहतूक महाड मार्गे वळवण्यात आली आहे. दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल बेअरिंग पद्धतीचे आहेत. पुलांना जवळपास ४० वर्षे झाली आहेत. यामुळे पुलाखालील भागात दुरुस्ती केली जात आहे. पाण्याखाली असलेली पायाचे काँक्रिट निखळले आहे. ते काढून पुन्हा आधुनिक पद्धतीचे काँक्रिट लावले जाणार आहे. आंबेत पुलाच्या बेअरिंग नादुरुस्त झाल्या आहेत. या बेअरिंग दुरुस्तीसाठी पुलाचे भाग उचलावे लागणार आहेत. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उपयोगात आणली जाणार आहे. आंबेत आणि दादली पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता होती तर टोळ पुलाच्या पायाला उभ्या भेगादेखील आधुनिक पद्धतीने भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बाहेरून काँक्रिटचे आवरण केले जाणार आहे. या पुलाच्यादेखील बेअरिंग बदलल्या जाणार आहेत. असेच काम दादली पुलाचेदेखील केले जाणार आहे. दादली पुलाचा पाया आणि खालील खडक यामध्ये तयार झालेली पोकळी काँक्रिटच्या साहाय्याने भरण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कामगार व निधीअभावी ही कामे ठप्प झाली आहेत.टोळ, दादली, आंबेत तिन्ही पुलांच्या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका दुरुस्तीकामांनाही बसला आहे. निधी आणि कामगार नसल्याने हे काम सध्या थांबले आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर असल्याने काम पूर्ण होणे शक्य नाही.- शिवलिंग उल्लागडे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग