शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

अलिबागचा प्रवास महागणार; गेट वे - मांडवा तिकीट दरात १५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 06:30 IST

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग तालुक्यातील मांडवादरम्यान दरवर्षी जवळपास १५ लाख प्रवासी या जलवाहतूक सेवेचा लाभ घेत असतात.

अलिबाग : अलिबागवरून मुंबईसाठी अथवा मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी हल्ली चाकरमानी प्रवासी सागरी मार्गाचा पर्याय निवडत आहेत. मुंबई ते अलिबाग हे अंतर एसटी किंवा इतर वाहनांपेक्षा सागरी मार्गाने कमी वेळात गाठता येते. म्हणून दररोज असंख्य प्रवासी या सागरी मार्गाचा उपयोग करतात. परंतु काही दिवसांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता गेट वे आॅफ इंडिया ते मांडवा ही लाँच सेवा अचानक महागली आणि त्याचा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागला. ही दरवाढ कमी करावी, अशी मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग तालुक्यातील मांडवादरम्यान दरवर्षी जवळपास १५ लाख प्रवासी या जलवाहतूक सेवेचा लाभ घेत असतात. या सेवेचे महत्त्व अलिबाग, रोहा आणि मुरूड तालुक्यांसाठी मोठे आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी पूर्वी १४५ ते १९५ रु पयांचा दर आकारला जात होता. यात २० रु पये प्रवासी कर आणि ५ रु पये सुरक्षा कराचा समावेश होता. मात्र आता या जलवाहतुकीसाठी १६५ ते २१५ रु पये मोजावे लागणार आहेत. तिकीट दरात १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर मुंबईहून एलिफंटा बेटावर जाणाऱ्या डिलक्स बोटींच्या दरात १५ ते २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.अचानक झालेल्या दरवाढीमुळे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मत्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांना लेखी स्वरूपातील पत्र लिहून सागरी प्रवासातील वाढलेले प्रवासी भाडे कमी करण्याची विनंती केली आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम या फेरी बोट चालविणाºया कंपन्यांचा करत आहेत. ही सागरी दरवाढ कमी करावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी दळवी यांनी केली आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग