शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागचा प्रवास महागणार; गेट वे - मांडवा तिकीट दरात १५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 06:30 IST

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग तालुक्यातील मांडवादरम्यान दरवर्षी जवळपास १५ लाख प्रवासी या जलवाहतूक सेवेचा लाभ घेत असतात.

अलिबाग : अलिबागवरून मुंबईसाठी अथवा मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी हल्ली चाकरमानी प्रवासी सागरी मार्गाचा पर्याय निवडत आहेत. मुंबई ते अलिबाग हे अंतर एसटी किंवा इतर वाहनांपेक्षा सागरी मार्गाने कमी वेळात गाठता येते. म्हणून दररोज असंख्य प्रवासी या सागरी मार्गाचा उपयोग करतात. परंतु काही दिवसांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता गेट वे आॅफ इंडिया ते मांडवा ही लाँच सेवा अचानक महागली आणि त्याचा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागला. ही दरवाढ कमी करावी, अशी मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग तालुक्यातील मांडवादरम्यान दरवर्षी जवळपास १५ लाख प्रवासी या जलवाहतूक सेवेचा लाभ घेत असतात. या सेवेचे महत्त्व अलिबाग, रोहा आणि मुरूड तालुक्यांसाठी मोठे आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी पूर्वी १४५ ते १९५ रु पयांचा दर आकारला जात होता. यात २० रु पये प्रवासी कर आणि ५ रु पये सुरक्षा कराचा समावेश होता. मात्र आता या जलवाहतुकीसाठी १६५ ते २१५ रु पये मोजावे लागणार आहेत. तिकीट दरात १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर मुंबईहून एलिफंटा बेटावर जाणाऱ्या डिलक्स बोटींच्या दरात १५ ते २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.अचानक झालेल्या दरवाढीमुळे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मत्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांना लेखी स्वरूपातील पत्र लिहून सागरी प्रवासातील वाढलेले प्रवासी भाडे कमी करण्याची विनंती केली आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम या फेरी बोट चालविणाºया कंपन्यांचा करत आहेत. ही सागरी दरवाढ कमी करावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी दळवी यांनी केली आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग