शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

रस्त्यांमुळे अलिबागकर त्रस्त

By admin | Updated: April 26, 2017 00:31 IST

बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्तीसंदर्भात सातत्याने निवेदन देऊनही त्याकडे लक्ष नसल्याने अलिबाग तालुक्यातील जनता आता संतप्त झाली आहे.

अलिबाग : बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्तीसंदर्भात सातत्याने निवेदन देऊनही त्याकडे लक्ष नसल्याने अलिबाग तालुक्यातील जनता आता संतप्त झाली आहे. २९ एप्रिल रोजी अलिबाग-रेवस व कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड या मार्गावर असलेल्या आरसीएफ गेट वायशेत येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मिनीडोर चालक मालक कल्याणकारी संस्थेने अलिबाग येथील अधिकाऱ्यांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व मिनीडोर चालक मालक कल्याणकारी संस्था अलिबागचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर हे करणार आहेत.अलिबागला जोडणाऱ्या चारपैकी तीन मुख्य रस्त्यांची धूळधाण झाली आहे. सगळीकडे फक्त खड्डे आणि खड्डेच पडलेले आहेत. गेल्या पावसाळ्यातले ते दिवस आठवून अजूनही प्रवाशांच्या पोटात गोळा येतो. पावसाळा जवळ येतो आहे, तशी लोकांची अस्वस्थता वाढत आहे. रस्त्यांबाबत बोलायला कोणीही तयार नाही. यामुळे जनता संतप्त झाली असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे येत्या २९ एप्रिल रोजी जनता रस्त्यावर उतरण्याच्या बेतात आहे. अशा आशयाचे निवेदन मंगळवारी मिनीडोर संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. मात्र त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जागेवर नव्हते.अलिबाग-रोहा रस्ता, अलिबाग-रेवदंडा रस्ता, अलिबाग-रेवस रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. मिनीडोर, रिक्षा,एसटी प्रवास म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवासकरण्या सारखे आहे. दुचाकीस्वारांना तर जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागतो आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीस अपघात झाल्याचा घटना घडल्या आहे. विशेषत: महिलांना अपघात झाले आहेत. मात्र प्रशासनाला जाग येत नाही,अशी खंतही व्यक्त केली जात आहे.अधिकारी आणि राजकारणी ठेकेदार यांच्यात सामान्य जनतेचे मात्र हाल सुरू आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना काही देणे-घेणे नसल्याचे समोर येत आहे. रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता हे रायगडात असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे या पावसापूर्वी तरी आपले रस्ते नीट होतील ना? याबाबत जनता साशंक आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर रस्ते चांगले होतील असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र हा पावसाळा आला तरी अजून परिस्थिती तशीच आहे. (प्रतिनिधी)