शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पांढऱ्या कांद्याला ‘अच्छे दिन’; अलिबागच्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर लोकप्रियता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 09:21 IST

कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राला कधी बळकटी देणारे, तर कधी डोळ्यांत पाणी आणणारे पीक आहे.

अलिबाग :

कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राला कधी बळकटी देणारे, तर कधी डोळ्यांत पाणी आणणारे पीक आहे. मात्र रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात लागवड होणारा पांढरा कांदा म्हणजे जणू पांढरे सोनेच  ठरले आहे. या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर  त्याची लोकप्रियता वाढत असून, राज्यभरातून  मागणी वाढत आहे. देश-विदेशात निर्यातीची तयारी केली जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे. 

जिल्ह्यात पूर्वापार खंडाळा, पवेळे, नेहुली, सहाण, ढवर, कार्ले, रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, वरसोली, थळ, नवगाव, किहीम, आवास अशा अलिबाग नजीकच्या ठराविक गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची  साधारणपणे २५० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. 

अलिबागचा पांढरा कांदा लाल गुलाबी कांद्यासारखा तिखट नसून गोड असतो. त्याला  शुभ्र चकाकदार रंग असून, त्याला मोठे आयुर्वेदिक महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र रोहा, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी पुणे, जीएमजीसी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांनी संयुक्तपणे पेटंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया चेन्नई  यांच्याकडे ‘अलिबाग पांढरा कांदा’च्या भौगोलिक मानांकनासाठी सन २०१९ मध्ये अर्ज  केला होता. 

कोरोना कालावधीमुळे  त्याला उशीर झाला. मात्र, पांढऱ्या कांद्यास भौगोलिक मानांकन गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये प्राप्त झाले. आता प्रकल्प संचालक आत्मा आणि पणन महामंडळ यांच्यामार्फत शेतकऱ्यांचे ऑथोराइज्ड यूझर रजिस्ट्रेशन म्हणजेच अधिकृत नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.

  कांद्याची एक वेणी ३ ते ४ किलो ग्रॅम असून, सरासरी २०० रुपये दराने विकली जाते. काही शेतकऱ्यांनी आता कांदा निर्यात करण्याची तयारी सुरू केली आहे.

  या कांद्याचे उत्पादन हेक्टरी ३३ टन इतके येते. उत्पादनासाठी येणारा खर्च ४ लाख ५० हजार प्रतिहेक्टरी १०  लाख इतके उत्पादन एका हंगामात मिळते.

  साधारण २५ हजार  प्रतिटन हा दर मिळाला तर प्रतिहेक्टरी ५ लाख निव्वळ नफा हे पीक मिळवून देत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.

कांदा कुजत नाहीहा कांदा पातीसह काढल्यानंतर सुकविण्यात येतो व पहाटेच्या वेळी त्याची वेणी बांधली जाते. नंतर वेणीसह कांदे विक्रीसाठी बाजारात येतात. त्यामुळे पानातील ॲबसिक ॲसिड कांद्यात उतरते आणि त्याला सुप्तावस्था प्राप्त होते. या वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रियेमुळे पांढरा कांदा न कुजता वर्षभर हवेशीर वातावरणात चांगल्या पध्दतीने टिकतो. त्यामुळे त्याला वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो. कांद्यातील कमी प्रमाणातील सल्फर घटक आणि समुद्रालगतचे खारे वारे व रेतीमय उथळ हलकी जमीन यामुळे या कांद्याला वैशिष्ट्यपूर्ण चव येते. या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे त्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. परिणामी, मागणीही वाढली आहे.