शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पांढऱ्या कांद्याला ‘अच्छे दिन’; अलिबागच्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर लोकप्रियता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 09:21 IST

कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राला कधी बळकटी देणारे, तर कधी डोळ्यांत पाणी आणणारे पीक आहे.

अलिबाग :

कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राला कधी बळकटी देणारे, तर कधी डोळ्यांत पाणी आणणारे पीक आहे. मात्र रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात लागवड होणारा पांढरा कांदा म्हणजे जणू पांढरे सोनेच  ठरले आहे. या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर  त्याची लोकप्रियता वाढत असून, राज्यभरातून  मागणी वाढत आहे. देश-विदेशात निर्यातीची तयारी केली जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे. 

जिल्ह्यात पूर्वापार खंडाळा, पवेळे, नेहुली, सहाण, ढवर, कार्ले, रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, वरसोली, थळ, नवगाव, किहीम, आवास अशा अलिबाग नजीकच्या ठराविक गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची  साधारणपणे २५० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. 

अलिबागचा पांढरा कांदा लाल गुलाबी कांद्यासारखा तिखट नसून गोड असतो. त्याला  शुभ्र चकाकदार रंग असून, त्याला मोठे आयुर्वेदिक महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र रोहा, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी पुणे, जीएमजीसी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांनी संयुक्तपणे पेटंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया चेन्नई  यांच्याकडे ‘अलिबाग पांढरा कांदा’च्या भौगोलिक मानांकनासाठी सन २०१९ मध्ये अर्ज  केला होता. 

कोरोना कालावधीमुळे  त्याला उशीर झाला. मात्र, पांढऱ्या कांद्यास भौगोलिक मानांकन गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये प्राप्त झाले. आता प्रकल्प संचालक आत्मा आणि पणन महामंडळ यांच्यामार्फत शेतकऱ्यांचे ऑथोराइज्ड यूझर रजिस्ट्रेशन म्हणजेच अधिकृत नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.

  कांद्याची एक वेणी ३ ते ४ किलो ग्रॅम असून, सरासरी २०० रुपये दराने विकली जाते. काही शेतकऱ्यांनी आता कांदा निर्यात करण्याची तयारी सुरू केली आहे.

  या कांद्याचे उत्पादन हेक्टरी ३३ टन इतके येते. उत्पादनासाठी येणारा खर्च ४ लाख ५० हजार प्रतिहेक्टरी १०  लाख इतके उत्पादन एका हंगामात मिळते.

  साधारण २५ हजार  प्रतिटन हा दर मिळाला तर प्रतिहेक्टरी ५ लाख निव्वळ नफा हे पीक मिळवून देत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.

कांदा कुजत नाहीहा कांदा पातीसह काढल्यानंतर सुकविण्यात येतो व पहाटेच्या वेळी त्याची वेणी बांधली जाते. नंतर वेणीसह कांदे विक्रीसाठी बाजारात येतात. त्यामुळे पानातील ॲबसिक ॲसिड कांद्यात उतरते आणि त्याला सुप्तावस्था प्राप्त होते. या वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रियेमुळे पांढरा कांदा न कुजता वर्षभर हवेशीर वातावरणात चांगल्या पध्दतीने टिकतो. त्यामुळे त्याला वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो. कांद्यातील कमी प्रमाणातील सल्फर घटक आणि समुद्रालगतचे खारे वारे व रेतीमय उथळ हलकी जमीन यामुळे या कांद्याला वैशिष्ट्यपूर्ण चव येते. या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे त्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. परिणामी, मागणीही वाढली आहे.