शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अलिबाग पालिकेचे कचरा प्रक्रिया केंद्र बंद; कांदळवनाची घुसमट थांबवली

By निखिल म्हात्रे | Updated: December 1, 2023 17:44 IST

सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया केंद्र सुरू होते, मात्र त्‍यानंतर वर्षभरापासून कचऱ्यावर काहीही प्रक्रिया झालेली नाही

अलिबाग - कचऱ्याच्या डोंगरामध्ये कांदळवनाची होणारी घुसमट थांबवण्यासाठी अलिबाग नगरपालिकेने सुका कचरा प्रक्रिया केंद्र मंजूर केले, यासाठी कोट्यवधींची अद्यावत यंत्रसामुग्री मागवण्यात आली, मात्र वर्ष उलटले तरी ही यंत्रसामुग्री वापराविना पडून आहे. त्‍यावरील आवरणही अद्याप काढलेले नाही. असे असताना केंद्र कार्यान्वित असल्याचा दावा नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया केंद्र सुरू होते, मात्र त्‍यानंतर वर्षभरापासून कचऱ्यावर काहीही प्रक्रिया झालेली नाही. कचऱ्याचे जे गट्टे आहेत, ते जुने आहेत. एमएसईबीने ७५ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठाही अद्याप सुरू केलेला नाही. नव्याने आणलेली यंत्रसामुग्री योग्य ठिकाणी कार्यान्वितही केलेली नाही, असे असताना अलिबाग नगरपालिकेने हे केंद्र सुरू असल्याचा दावा केला आहे. अलिबाग नगरपालिकेच्या या माहितीने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रक्रिया केंद्रात सुक्या कचऱ्यातून काच, धातू, प्लास्‍टिकसारख्या वस्तू वेगळ्या केल्या जाणार आहेत. तीन ऑपरेटर आणि कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र चालवले जाणार आहेत.

अनेक दिवसांपासून कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रे सुरू झालेले नाहीत. घनकचऱ्याच्या वाढत्‍या समस्‍येमुळे अलिबागमधील नागरिक त्रस्‍त आहेत. नगरपालिका आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतींसाठी एकच डम्पिंग ग्राऊंड आहे. चेंढरे, वेश्वी, वरसोली या ग्रामपंचायतींची लोकवस्‍तीही मोठी आहे, परंतु त्यांना स्वतःचे डंम्पिग ग्राऊंड नसल्याने त्‍या ग्रामपंचायतीही जमा केलेल्या कचरा अलिबाग नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर टाकतात. त्‍यामुळे दिवसाला शेकडो टन कचऱ्याचे डोंगर उभे राहतात.

डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूला कांदळवन आहेत. कचऱ्याला आग लागण्याच्या घटना अलिबागमध्ये अनेकदा घडल्‍या आहेत. आगीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण वाढत असून आरोग्‍याच्या व्याधी बळावत आहेत. दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले असून कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अलिबाग नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर अन्य तीन ग्रामपंचायतींचा कचरा जमा होतो. यासाठी संयुक्त डम्पिंग ग्राऊंडची मागणी सात वर्षांपूर्वीच करण्यात आली आहे. या संदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांकडेही पत्रव्यवहार करण्यात आला आहे; मात्र योग्य अंमलबजावणी झालेली नाही. मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी सुका कचरा प्रक्रिया केंद्र एक वर्षापूर्वीच सुरू झाले. नव्याने या ठिकाणी काही यंत्र आणली आहेत. त्यांच्यासाठी ७५ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा करावा लागणार असून एमएसईबीचे अधिकारी लवकरच ते बसवून देणार आहेत.- अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगरपालिका