शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

अलिबाग पालिकेचे कचरा प्रक्रिया केंद्र बंद; कांदळवनाची घुसमट थांबवली

By निखिल म्हात्रे | Updated: December 1, 2023 17:44 IST

सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया केंद्र सुरू होते, मात्र त्‍यानंतर वर्षभरापासून कचऱ्यावर काहीही प्रक्रिया झालेली नाही

अलिबाग - कचऱ्याच्या डोंगरामध्ये कांदळवनाची होणारी घुसमट थांबवण्यासाठी अलिबाग नगरपालिकेने सुका कचरा प्रक्रिया केंद्र मंजूर केले, यासाठी कोट्यवधींची अद्यावत यंत्रसामुग्री मागवण्यात आली, मात्र वर्ष उलटले तरी ही यंत्रसामुग्री वापराविना पडून आहे. त्‍यावरील आवरणही अद्याप काढलेले नाही. असे असताना केंद्र कार्यान्वित असल्याचा दावा नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया केंद्र सुरू होते, मात्र त्‍यानंतर वर्षभरापासून कचऱ्यावर काहीही प्रक्रिया झालेली नाही. कचऱ्याचे जे गट्टे आहेत, ते जुने आहेत. एमएसईबीने ७५ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठाही अद्याप सुरू केलेला नाही. नव्याने आणलेली यंत्रसामुग्री योग्य ठिकाणी कार्यान्वितही केलेली नाही, असे असताना अलिबाग नगरपालिकेने हे केंद्र सुरू असल्याचा दावा केला आहे. अलिबाग नगरपालिकेच्या या माहितीने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रक्रिया केंद्रात सुक्या कचऱ्यातून काच, धातू, प्लास्‍टिकसारख्या वस्तू वेगळ्या केल्या जाणार आहेत. तीन ऑपरेटर आणि कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र चालवले जाणार आहेत.

अनेक दिवसांपासून कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रे सुरू झालेले नाहीत. घनकचऱ्याच्या वाढत्‍या समस्‍येमुळे अलिबागमधील नागरिक त्रस्‍त आहेत. नगरपालिका आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतींसाठी एकच डम्पिंग ग्राऊंड आहे. चेंढरे, वेश्वी, वरसोली या ग्रामपंचायतींची लोकवस्‍तीही मोठी आहे, परंतु त्यांना स्वतःचे डंम्पिग ग्राऊंड नसल्याने त्‍या ग्रामपंचायतीही जमा केलेल्या कचरा अलिबाग नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर टाकतात. त्‍यामुळे दिवसाला शेकडो टन कचऱ्याचे डोंगर उभे राहतात.

डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूला कांदळवन आहेत. कचऱ्याला आग लागण्याच्या घटना अलिबागमध्ये अनेकदा घडल्‍या आहेत. आगीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण वाढत असून आरोग्‍याच्या व्याधी बळावत आहेत. दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले असून कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अलिबाग नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर अन्य तीन ग्रामपंचायतींचा कचरा जमा होतो. यासाठी संयुक्त डम्पिंग ग्राऊंडची मागणी सात वर्षांपूर्वीच करण्यात आली आहे. या संदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांकडेही पत्रव्यवहार करण्यात आला आहे; मात्र योग्य अंमलबजावणी झालेली नाही. मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी सुका कचरा प्रक्रिया केंद्र एक वर्षापूर्वीच सुरू झाले. नव्याने या ठिकाणी काही यंत्र आणली आहेत. त्यांच्यासाठी ७५ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा करावा लागणार असून एमएसईबीचे अधिकारी लवकरच ते बसवून देणार आहेत.- अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगरपालिका