शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेसची जादू हवेत विरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:59 IST

पारडे सेनेकडेच झुकलेले : सुनील तटकरेंच्या मताधिक्याची आकडेवारी कमी

- आविष्कार देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मते निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय धुरिणांकडून ठामपणे दावे केले जात होते. मात्र, असे असतानाच शेकापच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडीच्या विजयी उमेदवाराला अपेक्षित मते मिळाली नाहीत. गत लोकसभा निवडणुकीपेक्षही सुनील तटकरेंच्या मताधिक्याची आकडेवारी कमी झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून आणण्याचा चंग बांधला होता; परंतु प्रत्यक्षात मात्र शेकापची जादू तटकरेंच्या विजयाला विशेष कारणीभूत ठरली नसल्याचे निकालावरून दिसून येते. श्रीवर्धन मतदारसंघानेच त्यांना सर्वाधिक मताधिक्य दिल्याने शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना धूळ चारण्यात ते यशस्वी होऊ शकले. तटकरे यांना निवडून देण्याच्या शेकाप आणि काँग्रेसच्या वल्गना म्हणजे फुसका बार ठरल्या आहेत, त्यामुळे विजयाचे श्रेय हे फक्त श्रीवर्धन मतदारसंघाला देणे उचित ठरणार आहे.अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये तटकरे यांना ९९ हजार ४६३ आणि गीते यांना ७९ हजार ४९७ मते मिळाली. फक्त १९ हजार ९६६ मताधिक्य तटकरेंना मिळू शकले. २०१४ च्या निवडणुकीत शेकाप तटकरे यांच्या विरोधात लढली होती. त्यांनी रमेश कदम यांना स्वतंत्र उमेदवारी दिली होती. कदम यांना त्या वेळी एक लाख २९ हजार मते मिळाली होती. याचा विचार करता शेकापची रायगड लोकसभा मतदारसंघात किती ताकद होती हे स्पष्ट झाले होते. त्याचप्रमाणे शेकापचे आमदार सुभाष पाटील यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे ७५ हजार मते मिळाली होती आणि काँग्रेसचे उमेदवार मधुकर ठाकूर यांना सुमारे ४५ हजार मते मिळाली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडीमध्ये सामील झाले होते, त्यामुळे तटकरे यांची ताकद निश्चितच वाढली होती. तटकरे हे सुमारे ८० हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून निवडून येणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. २०१४ साली अलिबाग मतदारसंघात २० हजार ४१ मतांची आघाडी मिळाली होती. आताच्या निवडणुकीत १९ हजार ९६६ म्हणजे गेल्या निवडणुकीच्या मताधिक्याच्या तुलनेत फक्त ७५ मते अधिक आहेत. याचाच अर्थ शेकाप आणि काँग्रेसची जादू चालली नाही हेच आकड्यांवरून स्पष्ट होते.

शेकाप आणि काँग्रेस हे आघाडीत सामील झाल्यामुळे परस्पर पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले होते. गेली कित्येक दशके काँग्रेस आणि शेकाप हे पारंरपरिक कट्टर विरोधक राहिले आहेत. पक्षासाठी कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी तर फोडलीच आहेत, शिवाय रोटी-बेटी व्यवहारही त्यांच्यात होत नव्हता. तटकरे यांच्या जाहीरसभांमधून काँग्रेसचे माजी आमदार मधूकर ठाकूर आणि शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे मांडीला-मांडी लावून बसल्याचे चित्र कार्यकर्त्यांना रुचले नाही. चालून आलेली ही संधी शिवसेनेने सोडली नसती तर नवलच म्हणायचे. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध मतदान यंत्रातून दाखवून दिला होता, हे आता निकालावरून स्पष्ट होत आहे. कारण अलिबाग विधानसभा मतदारसंघातून तटकरे यांना ४० हजारांहून अधिक मताधिक्य देणार असल्याचे शेकापनेते सांगत होते. मात्र, प्रत्यक्ष मतदान यंत्र उघडल्यावर वेगळेच बाहेर आले.

२०१४ साली तटकरे यांच्या सोबत असणारे महेंद्र दळवी हे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेसोबत होते. दळवी यांनी २०१४ साली तटकरे यांना केलेली मदतवजा करून त्या जागी शेकापने मदत केली हे मान्य केले तरी शेकाप तटकरे यांना अलिबागमध्ये म्हणावे तसे मताधिक्य देऊ शकले नाही एवढे मात्र सत्य आहे.विधानसभेसाठी शेकाप-राष्ट्रवादी एकत्र?२०१९ च्या निकालावरून आगामी होणाºया विधानसभेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना युतीला रोखण्यासाठी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढू शकतात. मात्र, काँग्रेसला आघाडीत कितपत सामावून घेतील यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. अलिबाग विधानसभा काँग्रेस लढत आलेली आहे, त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर अथवा त्यांच्या घरातील अन्य उमेदवारासाठी हट्ट धरला जाणार हे लपलेले नाही.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा आमदार येथून निवडून गेलेला आहे, त्यामुळे शेकाप हक्क सोडणार नाही. शेकाप अलिबाग, पेण, पनवेल आणि उरणवर हक्क सांगू शकतो, तर कर्जत आणि श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसकडे कारण त्यांचे तेथे आमदार आहेत. महाड विधानसभा काँग्रेस लढत आली आहे, त्यामुळे तो त्यांच्याकडे राहू शकतो. प्रत्यक्षात हे आघाडी होणे आणि न होणे यावरच अवलंबून राहणार आहे.की फॅक्टरकाय ठरला?२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडीमध्ये सामील झाले होते; त्यामुळे सुनील तटकरे यांची ताकद वाढली.

टॅग्स :raigad-pcरायगड