शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

अलिबाग हेच नाव योग्य; बदलायचे झाल्यास कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा विचार व्हावा!

By राजेश भोस्तेकर | Updated: April 4, 2024 13:24 IST

राहुल नार्वेकर यांच्या मागणीला रघुजी राजे आंग्रे यांचा विरोध

अलिबाग : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अलिबागचे नाव बदलून मायनाक भंडारी करावे अशी मागणी केली आहे. यावर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे यांनी विरोध दर्शवून नार्वेकर यांच्या मागणीचा निषेध केला आहे. निवडणूक काळात अशी मागणी करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम नार्वेकर यांनी करू नये असे ही रघुजी राजे आंग्रे यांनी म्हटले आहे. अलिबाग हेच नाव राहावे असे सांगून बदलायचे झाल्यास कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा विचार व्हावा अशी प्रतिक्रिया रघुजी राजे यांनी दिली आहे. 

मायनाक भंडारी याच्या बाबत माझ्या मनात आदर आहे. ऐतिहासिक अलिबाग नगरी उभारणीत, जडण घडणीत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे योगदान एकमेव द्वितीय आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या काळात शहराचे नाव बदलण्याचे मुद्दे उपस्थित करून एखाद्या समाजाचे लांगुन चालन करणे किंवा त्याच्यासाठी राजकीय अभिनिवेश बाळगून कुठल्या प्रकारची मागणी करणे हे समर्थनीय नाही आहे. मी याचा निषेध करतो. असे रघुजी राजे आंग्रे यांनी म्हटले आहे.

अलिबागचे नाव हे ऐतिहासिक नाव आहे. या नगरीला एक ऐतिहासिक वारसा आहे. कान्होजी आंग्रेच्या कालखंड पासून ते आजवर नगरिने अनेक नवरत्न महाराष्ट्राला देशाला दिली आहेत. शहराचे नाव हे अलिबागच राहिले पाहिजे जर बदलायचे झाल्यास कान्होजी आंग्रे यांच्या नावाचा विचार झाला पाहिजे माझे प्रामाणिक मत आहे. निवडणुकीच्या काळात अशी मागणी करणे हे अनेक समाजात तेढ निर्माण करणे कारण नसताना वाद उपस्थित करण्याचा विषय आहे. याबाबत राहुल नार्वेकर यांनी दूर राहावे असे माझे मत आहे. असेही आंग्रे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग