शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

उमटे धरणावरील जलशुद्धीकरण सुरू, ४१ वर्षांनी ६२ गावांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 04:51 IST

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणावर अखेर जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ४१ वर्षांनी ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग - तालुक्यातील उमटे धरणावर अखेर जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ४१ वर्षांनी ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे. ६२ गावे-वाड्यातील सुमारे ६० हजार ग्रामस्थांना उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा फायदा होणार आहे. देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे लोटली तरी, ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत होते. आता शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये १९७८-७९ या कालावधीत उमटे धरण बांधण्यात आले होते. या धरणामुळे या विभागातील १५ ग्रामपंचायतींमधील तब्बल ५२ हजार ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे; परंतु धरण बांधल्यापासून धरणामध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले नव्हते. त्याचप्रमाणे धरणातील गाळ देखील काढण्यात आलेला नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत होते. आता जल शुद्धीकरण यंत्र बसवण्यात येऊन ते सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याबद्दल ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे विशेष आभार मानले आहेत.जिल्हा परिषदेने सुमारे साडेसहा कोटी खर्चाच्या जलशुद्धीकरण योजनेला मंजुरीही दिली होती, मात्र ठेकेदाराने काम पूर्ण करण्याआधीच सुमारे दोन कोटी ९० लाख रुपयांची रक्कम अदा केली होती. या विरोधात ग्रामस्थांनी प्रशासन आणि सरकारकडे तक्रारीही केल्या होत्या.काँग्रेस आणि शिवसेनेने याबाबत रायगड जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. धरण उशाला असल्याने पाणी मुबलक प्रमाणात मिळते; परंतु त्या पाण्यामध्ये कचरा, प्लॅस्टिकचे तुकडे, कुजलेली पाने मोठ्या प्रमाणात आढळायचे. काही वेळेला मृत जनावरेसुद्धा त्यामध्ये पडलेली असायची. यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागायचे.गावांमध्ये एमआयडीसीचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थ उमटे धरणातील पाणी गाळून घ्यायचे. त्यानंतर त्या पाण्यावर तुरटी फिरवून तेच पाणी पिण्यासाठी वापरायचे. जिल्हा परिषदेने यावर उपाययोजना म्हणून तेथे जल शुद्धीकरण यंत्र बसवणे, पाइप लाइनच्या कामासाठी सुमारे तीन कोटी ३४ लाख रुपये देऊ केले होते. मात्र, आधीच्या ठेकेदाराने काम न करताच तब्बल दोन कोटी ९० लाख रुपयांचा निधी लाटल्याबाबत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अ‍ॅड. काँग्रेसचे कौस्तुभ पुनकर, अ‍ॅड. राकेश पाटील यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत प्रशासनाने नवीन ठेकेदाराची नेमणूक केली. त्यांनी जलशुद्धीकरण यंत्र बसवल्यानेआता शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे.जलशुद्धीकरण यंत्र बसवण्याचे काम देण्यात आले होते. ते काम पूर्ण करण्यात आले आहे. ग्रामस्थांना आता शुद्ध पाणी मिळणार आहे, असे ठेकेदार शशांक सावंतदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे मानले विशेष आभारआधीच्या ठेकेदाराने उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील २ कोटी ९० लाख रुपयांचा निधी हडप केला आहे. त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. याप्रकरणी रायगड जिल्हा प्रशासनाने योग्य ती चौकशी करून संबंधितांकडून रक्कम वसूल करावी, अशी मागणी अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ‘लोकमत’ने सातत्याने याबाबत पाठपुरावा केला होता. आज अखेर ग्रामस्थांना ‘लोकमत’मुळे न्याय मिळाला आहे. त्यामुळे ‘लोकमत’चे आभार मानतो, असेही अ‍ॅड. पुनकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड