शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तब्बल ७५ वर्षांपासून अंधारात असलेली हुतात्मा नाग्या कातकरी प्रकाशाने उजळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 19:09 IST

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत वीजेचे पोल काढून जप्त करून अधिकाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली होती.

मधुकर ठाकूर

उरण : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तब्बल ७५ वर्षांपासून अंधारात असलेली हुतात्मा नाग्या कातकरी यांची चिरनेरमधील ३० कुटुंबांची चांदायली आदिवासीवाडी शनिवारी (३०) प्रकाशमान झाली असल्याची माहिती उरण महावितरणचे उप अभियंता विजय सोनवले यांनी दिली. चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील हुतात्मा नाग्या कातकरी यांची चांदायली आदिवासी वाडीतील ३० कुटुंब ७५ वर्षांपासून अंधारात चाचपडत होती. चांदायली आदिवासी वाडीपर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. वीजेचे पोलही टाकण्यात आले होते. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत वीजेचे पोल काढून जप्त करून अधिकाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली होती. तसेच दंडात्मक कारवाईपोटी वीजमंडळाला २० हजार रुपये दंड भरावा लागला.त्यानंतर मात्र वनविभागाची परवानगी घेऊन काम करण्यात आले असल्याची माहिती सोनवले यांनी दिली. 

त्याचबरोबर चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल,उपसरपंच सचिन घबाडी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी कार्यकर्ते अमर कातकरी, राजू कातकरी, भरत कातकरी ,यशवंत कातकरी, महेंद्र कातकरी, जयवंत कातकरी, सुधीर कातकरी यांनीही वीज पुरवठा करण्यासाठी उरण वीज महामंडळाचे मुख्य अभियंता विजय  सोनवले यांच्याकडे  सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर सर्वच अडथळे दूर करून चांदायली आदिवासी वाडी पर्यंत ६ लाख ७५ रुपये खर्च करून २१ वीजेचे पोल टाकण्यात आले आहेत.पोल टाकण्यात आल्यानंतर शनिवारी (३०) संध्याकाळपासून चांदायली आदिवासी वाडीवर वीजपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती उरण महावितरणचे उप अभियंता विजय सोनवले यांनी दिली. चांदायली आदिवासी वाडी ७५ वर्षांनंतर प्रकाशाने पहिल्यांदाच उजळली निघाली आहे. त्यामुळे  येथील आदिवासींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण