शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

पाच मिनिटांत येतो सांगून ते नागाव समुद्रात उतरले, पण परत आलेच नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 14:24 IST

नियतीचा खेळ अनाकलनीय असतो, हेच या घटनेनं पुन्हा स्पष्ट झालंय.

जयंत धुळप / अलिबागः नागाव समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेले कोपरखैरणेमधील तीन तरुण समुद्रात बुडाले असून त्यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. फक्त पाचच मिनिटांसाठी समुद्रात उतरतो, असं म्हणून हे तिघं गेले आणि परतच आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसलाय. नियतीचा खेळ अनाकलनीय असतो, हेच या घटनेनं पुन्हा स्पष्ट झालंय. 

नवी मुंबईतील कोपरखैरणेमधील सेक्टर १४, १५, १७ आणि १८ येथे राहणारे १३ मित्र मिनी बसने काल संध्याकाळी नागावला पोहोचले होते. हे सर्वजण फुटबॉल खेळाडू होते. त्यांच्यासोबत त्यांचे प्रशिक्षकही पिकनिकला गेले होते. नागावचा किनारा पाहून सगळ्यांनाच समुद्रात उतरण्याचा मोह झाला होता, पण संध्याकाळ झालेली असल्यानं प्रशिक्षकांनी त्यांना थांबवलं. अंधारात समुद्रात न जाण्याचा सल्ला स्थानिक मंडळींनीही सगळ्यांना दिला. पण, आम्ही पाचच मिनिटांत जाऊन येतो, असं म्हणत चैतन्य किरण सुळे (२०), आशिष मिश्रा (२४) आणि सुहाद सिद्दगी (२१) या तिघांनी समुद्रात धाव घेतली. त्यानंतर रात्रभर हे तिघं परत न आल्यानं इतरांनी पोलिसांत धाव घेतली. 

या तिघांना शोधण्याचं काम सकाळी सुरू झालं, तेव्हा आशिष मिश्राचा मृतदेह कोर्लई किनाऱ्यावर आणि सुहासचा मृतदेह आग्राव किनाऱ्यावर सापडला. मच्छिमारांच्या मदतीने पोलीस चैतन्यचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :alibaugअलिबाग