शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

तब्बल २९ तासांनंतर ओसरले कुंडलिका नदीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:02 IST

वाहतूक सुरळीत : रोह्यात जनजीवन पूर्वपदावर

रोहा : रोह्याच्या कुंडलिकेला आलेल्या पुराचे पाणी तब्बल २९ तासांनंतर ओसरले. निसर्गाच्या प्रकोपाचा आणि लहरी वृत्तीचा रोहेकरांना यंदा हा वेगळा अनुभव आला आहे. या कालावधीत बंद राहिलेली वाहतूक रविवारी पहाटे पूर्ववत सुरू झाली. रोहा अष्टमीकरांसह तालुक्यातील इतर भागातील नागरिक, प्रवासी, कामगार आणि विद्यार्थ्यांचे विस्कळीत झालेली जनजीवन सुरुळीत झाले आहे.

गेले काही दिवस जोरदार कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कुंडलिका नदीला शुक्रवारी मध्यरात्री पूर आला. नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आणि पुराचे पाणि रोहा शहरातील दमखाडी, अष्टमी, वरसे आणि रोठ खुर्द गावांत शिरले. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मध्यरात्री तीन वाजल्यापासून पुलावरून अडीच ते तीन फूट पाणी वाहत होते. पुलावरूनही पाणी जाऊ लागल्याने रोहा पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद ठेवली होती. अष्टमीकडील गावांतून धाटाव एमआयडीसीमध्ये दुसºया पाळीसाठी आलेल्या कामगारांना काही कंपन्यांनी पाण्याची पातळी वाढल्याचे समजताच रात्री लवकर सोडले. गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे भिरा व डोलवाहळ धरणातून पाणी सोडण्यात येण्याची भिती व्यक्त होत होती. नदीच्या पाण्याची वाढलेली पातळी रात्री उशिरापर्यंत ओसरली नसल्याचे पाहून सखल भागात राहणाºया नागरिकांत थोडे भितीचे वातावरण होते. त्यामुळे नागरिक सतत नदीच्या पातळीकडे लक्ष ठेवून होते. मध्यरात्रीनंतर पावसाने अधून मधून थोडी विश्रांती घेतली, रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान वाढलेली पाणी पातळी ओसरली. त्यामुळे २९ तास इतका कालावधी पुराचे पाणी रोहा अष्टमीत राहण्याची ही पहिली घटना होती. निसर्गाच्या प्रकोपाचा आणि लहरी वृत्तीचा यंदा हा वेगळा अनुभव रोहेकरांना आला आहे. पाणी ओसारल्याने अष्टमीकडील अनेक गावांतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.च्सतत कोसळणाºया पवसाचा फटका अष्टमी नाका आदी ठिकाणच्या लोकांना बसला असला तरी अष्टमी मराठा आळी येथील प्रेमा मारूती खैरे यांचे घर या पावसामुळे कोसळल्याने सरकारी यंत्रणेने पंचनामा करून मदत करवी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड