शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ७२ वर्षांनी सुटली विजेची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 23:53 IST

देश स्वतंत्र झाल्यापासून भेडसावत असणाऱ्या वीज समस्येतून, नव्या मुरुड विद्युत उपकेंद्राच्या मंगळवारी झालेल्या लोकार्पणानंतर कायमस्वरूपी मुक्ती मिळाली आहे.

आगरदांडा : भारतातील मिनी गोवा म्हणून समजल्या जाणाऱ्या मुरुड तालुक्याला देश स्वतंत्र झाल्यापासून भेडसावत असणाऱ्या वीज समस्येतून, नव्या मुरुड विद्युत उपकेंद्राच्या मंगळवारी झालेल्या लोकार्पणानंतर कायमस्वरूपी मुक्ती मिळाली आहे. यामुळे मुरुड तालुक्यातील तब्बल २५ हजार वीज ग्राहकांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.मुरुड तालुका हा मुंबई, पुण्यापासून हा हाकेच्या अंतरावर असल्याने वीकेंडसाठी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येत असतात. वर्षाला सुमारे दहा लाख पर्यटक येथे येतात. गोव्यासारखाच समुद्रकिनारा मुरुडला लाभला आहे, परिणामी मुरुड तालुक्याला मिनी गोवा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देश-विदेशातील नावलौकिक प्राप्त होत असतानाच सततच्या खंडित वीज पुरवठ्याची गंभीर समस्या येथे भेडसावत होती. सण आणि शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांच्या काळात वीज पुरवठा खंडित होत असे आणि त्यातून लोकप्रक्षोभ उसळत असे. परिणामी सामाजिक शांततेवर त्याचा परिणाम होत असे. त्यातून वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याचे देखील प्रसंग येथे घडले होते. त्यास आता पूर्णपणे पूर्णविराम मिळाला आहे.मुरुडसाठी धाटाव (रोहा) येथून एक वीजवाहिनी होती. वाढत्या विकासाबरोबर आणि वीज ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे विजेचा वापर वाढला आणि या एका वाहिनीतून होणारा वीज पुरवठा अपुरा पडू लागला आणि त्यातूनच वीज खंडित होण्याच्या प्रकारात वाढ होत गेली होती. मुरुडकरिता स्वतंत्र वीज उपकेंद्र होणे जरुरी होते.राज्याचे तत्कालीन ऊर्जा मंत्री आणि रायगडचे पालकमंत्रीसुनील तटकरे यांनी ही समस्या विचारात घेवून मुरुड वीज उप केंद्रास मंजुरी देवून निधीची तरतूद केली होती. यामुळे येथे वीज उपकें द्र उभे राहिले आहे.>नागरिक समाधानीविद्यमान ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या कारकिर्दीत या वीज उप केंद्रांची उभारणी करण्यात आली. मंगळवारी अलिबाग मुरुडचे आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते यावीज उप केंद्राचे लोकार्पण करण्यात आलेआहे.येथे उभारलेल्या वीज उपकेंद्रामुळे विजेची समस्या सुटल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त के ले असून आता बत्ती गुल होणार नसल्याने आनंदोत्सव साजरा के ला.