शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

केंद्राकडून तोडा-फोडा नितीचा अवलंब - राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2022 05:50 IST

शेतकरी कामगार पक्षाचा झाला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांमध्ये ज्या पद्धतीने  ‘तोडा-फोडा’ नितीचा अवलंब केला होता, तसाच प्रकार सध्या केंद्रात  सत्तेत बसलेल्यांकडून सुरू आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगारवर्गाला देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकार करीत आहे.  सत्ता उलथवण्यासाठी पुन्हा  स्वातंत्र्याचा दुसरा लढा उभारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी  सर्व  पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे मत आम आदमी पक्षाचे मंत्री गोपाळ राय यांनी व्यक्त केले. 

शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त  वडखळ (ता. पेण) येथे मंगळवारी राज्यस्तरीय मेळावा झाला. त्यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे - भाजप सरकारवर कडाडून टीका केली.  राजू शेट्टी म्हणाले, ‘ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचा ससेमिरा मागे लागत असल्याने अस्तित्व टिकविण्यासाठी मनाला मुरड घालून अनेक जण भाजपमध्ये जात आहेत. 

सिलिंदर दिले, दर आवाक्याबाहेरमहिलांना चुलीवर जेवण करावे लागते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ कोटी ५९ लाख जणांना गॅस वाटप केले. मात्र, त्यानंतर गॅस सिलिंडरच्या किमती वाढू लागल्याने एकही नवा सिलिंडर घेतलेला नाही, असे माहिती अधिकारात प्राप्त झाल्याचे राजू शेट्टी यांनी भाषणात सांगितले.