शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

केंद्राकडून तोडा-फोडा नितीचा अवलंब - राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2022 05:50 IST

शेतकरी कामगार पक्षाचा झाला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांमध्ये ज्या पद्धतीने  ‘तोडा-फोडा’ नितीचा अवलंब केला होता, तसाच प्रकार सध्या केंद्रात  सत्तेत बसलेल्यांकडून सुरू आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगारवर्गाला देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकार करीत आहे.  सत्ता उलथवण्यासाठी पुन्हा  स्वातंत्र्याचा दुसरा लढा उभारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी  सर्व  पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे मत आम आदमी पक्षाचे मंत्री गोपाळ राय यांनी व्यक्त केले. 

शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त  वडखळ (ता. पेण) येथे मंगळवारी राज्यस्तरीय मेळावा झाला. त्यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे - भाजप सरकारवर कडाडून टीका केली.  राजू शेट्टी म्हणाले, ‘ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचा ससेमिरा मागे लागत असल्याने अस्तित्व टिकविण्यासाठी मनाला मुरड घालून अनेक जण भाजपमध्ये जात आहेत. 

सिलिंदर दिले, दर आवाक्याबाहेरमहिलांना चुलीवर जेवण करावे लागते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ कोटी ५९ लाख जणांना गॅस वाटप केले. मात्र, त्यानंतर गॅस सिलिंडरच्या किमती वाढू लागल्याने एकही नवा सिलिंडर घेतलेला नाही, असे माहिती अधिकारात प्राप्त झाल्याचे राजू शेट्टी यांनी भाषणात सांगितले.