शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

अब की बार ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला तडीपार करा : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 12:05 IST

 मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (९) उरण येथे संध्याकाळी उशिरा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

मधुकर ठाकूर 

उरण : लोकसभा निवडणुकीत ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला तडीपार करण्यासाठी आता विजयासाठी तुतारी वाजवायची आहे. भाजपाला हात दाखवून मशाल पेटवायची आहे, असे आवाहन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उरणच्या जाहीर सभेततून केले.  मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (९) उरण येथे संध्याकाळी उशिरा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

उरण नगरपरिषदेच्या तिर्थरुप नानासाहेब धर्माधिकारी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत उबाठाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर चांगलेच टिकेचे आसूड ओढले. दक्षिणेकडील राज्यांनी ठरवले आहे की भाजपला डोक्यावर बसवायचे नाही. उत्तर भारतातही बदल, परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे अब की बार ४०० पारची घोषणा करणारे भाजप चंद्रावरून की अमेरिकेतून कुठून ४०० पार करणार असा रोखठोक सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

लोकसभा निवडणूकीत भाजप विरुद्ध भारत अशी लढाई आहे. संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे. देश,महाराष्ट्र विरोधी भाजप आहे.त्यामुळे देशभरातील विविध राज्यात केंद्र सरकारचे अत्याचार वाढतच चालले आहेत.भाजपचे प्रज्वल रेवण्णा यांनी घरातील आणि पक्षातील हजारो महिलांचा अमानुषपणे छळ करुन बलात्कार केला.अशा रेवण्णाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते.मतदान झाल्यानंतर त्याला विदेशात पळून जाण्यासाठीही त्यांनी मदत केली असल्याचा गंभीर आरोपही आदित्य यांनी भाषणातून केला.

 २०२२ मध्ये गद्दारी, पक्ष फोडाफोडी करण्याच्या भाजपच्या गलिच्छ राजकारणा विरोधात लढत आहोत.गद्दारीने राज्याच्या सत्तेवर आलेल्यांमध्ये काही मंत्री भ्रष्टाचारांनी बरबरटले आहेत.उत्तर प्रदेशातही महाराष्ट्राप्रमाणेच पलटीराम निघाले आहेत . ३७० कलम रद्द करुनही काश्मीरमधील ना दहशतवाद संपला, ना पंडितांना चांगले दिवस आले ,ना भरभराट झाली. आज तिथे परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे मात्र भाजपला निवडणुकीत उमेदवारही मिळाले नाहीत. ३०-४० हजार लोकेंद्रशासित लडाखमध्ये सामान्य जनतेला संघर्ष करावा लागत आहे.लडाखला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी भाषणातून केला.

गद्दारांना ५० खोके सामान्यांच्या बॅक खात्यात १५ लाख आले का.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का.पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळाली का.शेतकऱ्यांना लाभ मिळाला का.असे अनेक प्रश्न आदित्य यांनी भाषणातुन उपस्थित केले.आज देशात महागाई ,बेरोजगारी आणि महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे.जिथे महिलांची संख्या अधिक तिथे विश्वासही अधिक त्यामुळे विश्वास तिथे विजय याकडेही आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभेत लक्ष वेधले.

 दोन वर्षं  भाजप सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे.कधी पाहिले आहे का नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाजपने दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करताना.तसेच संभाजी नगरला विमानतळाला उध्दव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देण्याचा प्रस्ताव केला होता.

मात्र अडीच वर्षे झाली भाजप सरकारने नाव दिले नाही.याच्याही पलिकडे जाऊन पाहिले तर गोव्यामध्ये  एअर पोर्टला मनोहर पर्रीकर यांचे नाव दिले आहे. अयोध्येतील एअरपोर्टचे नाव वाल्मिकी एअरपोर्ट केले आहे.आमचा काही आक्षेप नाही.मात्र उत्तर प्रदेश, गोवा येथील विमानतळाचे नाव बदलले आहे.तर मग महाराष्ट्राने काय चुक केली आहे.नवीमुंबई विमानतळाला तुम्ही दि.बा. पाटील यांचे नाव का देत नाहीत. संभाजीनगरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज नाव का देत नाही.अशा महाराष्ट्र व्देषी भाजपाला या महाराष्ट्र व्देषी मिंधे सरकारला तुम्ही मतदान करणार का .हेच नाही तर आपले उद्योगधंदे गुजरातला घेऊन गेले आहेत.त्यामुळे आता केंद्र सरकार बदलायचे आहे.महाराष्टातील तरुणांचा हक्काचा रोजगार तुम्ही गुजरातला नेणार तर आम्ही तुम्हाला नडणारच.त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करुन महाराष्ट्राचा, देशाचा अंधकार दूर करून टाका असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे