शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

९९ टक्के शाळा, अंगणवाड्यांना पुरेसे पिण्याचे पाणी

By निखिल म्हात्रे | Updated: April 5, 2024 15:37 IST

‘जलजीवन मिशन’नुसार जिल्ह्या २५० पेक्षा अधिक योजना पूर्ण

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : जलजीवन मिशन कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील ९९ टक्के शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत शाळांमधील मतदान केंद्रांनाही यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात ‘हर घर नल - हर घर जल अभियान’ राबवण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत जलजीवन मिशनच्या २५० पेक्षा अधिक योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर, उर्वरित प्रगतिपथावर आहेत. या योजनेअंतर्गत गावे वाड्यांबरोबर तेथील शाळांनाही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांबरोबरच शाळांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच स्वच्छतागृहांचीही गंभीर समस्या निर्माण झाली होती. शौचालयांचा वापर करता येत नव्हता. ही समस्या निकाली काढण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन योजनेतील पाण्याची जोडणी शाळांनाही देण्यात आली. त्यामुळे ज्या शाळांमध्ये पाणीसमस्या भेडसावत होती, ती निकाली निघाली आहे. जिल्ह्यातील ३ हजार १५५ शाळा आणि ३ हजार ५१ अंगणवाड्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. आता शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी तर उपलब्ध झाले असून, स्वच्छतागृहाचा वापर करणे सहज शक्य झाले.मतदारांनाही सुविधा -

रायगड लोकसभा मतदार संघासाठी येत्या ८ मे रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात २ हजार ६९४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. बहुतांश केंद्रे ही शाळांमध्येच आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रांवर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा पुरवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास सर्व शाळांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. निवडणुकीच्या काळात हा मोठा दिलासा मानला जात आहे.जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शाळा आणि अंगणवाड्यांना नळजोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. केवळ ३ शाळा आणि २ अंगणवाड्यांचे पाणी पुरवठ्याचे काम शिल्लक आहे. ते एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल. - संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :alibaugअलिबाग