शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आदर्श ग्रामला ‘सीएसआर’चे बळ

By admin | Updated: August 28, 2015 23:19 IST

स्वच्छ भारत अभियानाची सांगड संसद आदर्श ग्राम योजनेत घालण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दत्तक घेतलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावात उत्कृष्ट

- आविष्कार देसाई,  अलिबागस्वच्छ भारत अभियानाची सांगड संसद आदर्श ग्राम योजनेत घालण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दत्तक घेतलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावात उत्कृष्ट दर्जाची वैयक्तिक शौचालये उभारण्यासाठी जेएसडब्लू इस्पात कंपनी सीएसआर फंडातून १५ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ उभे करणार आहे. त्यामुळे दिवेआगर हागणदारीमुक्त होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यावे अशी अपेक्षा केली आहे. त्यांच्याच संकल्पनेतून संसद आदर्श ग्राम योजना जन्माला आली आहे. या योजनेंतर्गत संबंधित गावात आवश्यक ती सर्व विकासकामे करता येणार आहेत. खासदारांना तेथे विकासकामे करताना विशेष निधीही दिला जाणार आहे. अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावाचा समावेश संसद ग्राम योजनेत केला असून गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला दिवेआगरमध्ये एकूण १२२ वैयक्तिक शौचालये उभारायची आहेत. पैकी ३९ शौचालये बांधून पूर्ण झाली असून ८३ शौचालये बांधणे अद्यापही बाकी आहेत. जेएसडब्लू इस्पात कंपनी चांगल्या प्रतीची ६३ शौचालये बांधून देण्यास तयार झाली आहे. यासाठी लागणारा १५ लाख रुपयांचा निधी कंपनी त्यांच्या सीएसआर फंडातून खर्च करणार आहे. याबाबतची बैठक नुकतीच कंपनीमध्ये पार पडली. (वार्ताहर)८३ स्वच्छतागृहेअनंत गीते यांनी दिवेआगरमध्ये विकासकामांचे नुकतेच भूमिपूजन केले आहे. त्यांना कंपनीचा सीएसआर फंड विधायक कामासाठी खर्च करण्यात कोणतीच अडचण येणार नसल्याने कंपनीही त्यांना सढळ हस्ते मदत करणार यात शंका घेण्याचे कारण नाही. कंपनीकडून एकूण ८३ स्वच्छतागृहे बांधून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे रायगड समन्वयक जयवंत गायकवाड यांनी सांगितले.