शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 04:45 IST

नेरळ ग्रामपंचायतीचा निर्णय : पदपथावरील दुकाने हटवणार

नेरळ : शहरात अनधिकृत पार्किं ग वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. यावर उपाय म्हणून नेरळ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच यांनी नेरळ शहरातील मुख्य रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळ ग्रामपंचायत आणि पोलिसांकडून ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई सोमवार, ७ जानेवारी पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने पार्क करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नेरळ ग्रामपंचायतीने शहरात फलक लावून केले आहे.

नेरळमध्ये मोठ्या प्रमाणात नगरीकीकरण होत आहे. मात्र, शहरात कोणत्याही प्रकारे पार्किंग व्यवस्था नसल्याने मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत दुचाकी तसेच चारचाकी वाहने रस्त्यावर अनधिकृतपणे पार्क केल्या जातात, त्यामुळे दररोज शहरात वाहतूककोंडी होते. या वाहतूककोंडीवर नेरळ ग्रामपंचायत आणि वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. बुधवारला आठवडाबाजार भरत असल्याने चालण्यासही जागा नसते. बाजारपेठेतून टॅक्सी, रिक्षा, मालवाहतूक करणारे टेम्पो अशी मोठी वाहने येत असल्याने कोंडीत आणखी भर पडते. अनधिकृत वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने दिवसा व रात्री वाहने पार्क केली असल्यास नेरळ ग्रामपंचायतीमार्फत कार्यवाही म्हणून स्टिकर लावून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.च्नेरळ आणि परिसरातील दिवसेन्दिवस लोकसंख्या वाढत आहे. या ठिकाणी अनेक मोठे गृहप्रकल्प उभे राहत असल्याने वर्दळ वाढली आहे. तुलनेने रस्ते छोटे पडत आहेत. शिवाय, पार्र्किं गसाठीही योग्य सुविधा नसल्याने नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात, त्यामुळे वाहतूककोंडी होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने अवैधपार्किं गविरोधात मोहीम सुरू केली आहे.नवनिर्वाचित सरपंच यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे; परंतु ही कारवाई कायमस्वरूपी असणार का? की फक्त आठवडाभरापुरती, याअगोदर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती; परंतु चार दिवसांतच ही कारवाई थंडावली आणि पुन्हा नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला, तसेच फुटपाथवर बसणाºयावरही कारवाई करावी, यामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.- सुमित क्षीरसागर, स्थानिक, नागरिकवाहनचालकांवरफौजदारी गुन्हे

च्नेरळ शहरात नियम मोडणाºया वाहनचालक यांच्यावर फौजदारी गुन्हाही नोंदविण्यात येणार आहे. नेरळ ग्रामपंचायतीकडून या निर्णयाचे स्वागत होत असले तरी ही कारवाई किती दिवस चालणार, हा खरा प्रश्न आहे.च्मागील काही महिन्यांपूर्वीही अशीच कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती; परंतु आठवडाभरातच ही कारवाई थंडावल्याने परिस्थिती जैसे थेच झाली आहे.च्तसेच नेरळ बाजारपेठेतील फुटपाथवर बसलेल्या भाजी-विक्रे त्यांवरही कारवाई करून त्यांना नेरळ व्यापारी संकुल येथे बसण्यास सांगितले होते; परंतु पुन्हा भाजी विक्रे त्यांनी आपले बस्तान पदपथावर थाटले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग