शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

पेण अर्बनच्या ५१.८ कोटींच्या वसुलीसाठी कृती दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 03:04 IST

पेण अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी ठेवींचा परतावा करण्यासाठी, दोषी व्यक्ती व तत्कालीन संचालकांच्या जप्त करावयाच्या मालमत्ता लवकरात लवकर अधिसूचित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी आयोजित बैठकीत दिले.

- जयंत धुळप अलिबाग : पेण अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी ठेवींचा परतावा करण्यासाठी, दोषी व्यक्ती व तत्कालीन संचालकांच्या जप्त करावयाच्या मालमत्ता लवकरात लवकर अधिसूचित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी आयोजित बैठकीत दिले. दरम्यान, ५० हजार रुपयांच्या वरच्या रकमेची ७८७ कर्जखात्यांमधील ५१ कोटी ८ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी बँकेच्याच ५० कर्मचाऱ्यांचे कृती दल स्थापन करण्यात आले असल्याचीही माहिती बैठकीत देण्यात आली.दी पेण को-आॅप. अर्बन बँक लि. या बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कृती समितीची बैठक बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती. मात्र, ही बैठक सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. अखेर विशेष कृती समितीचे दिवंगत सदस्य बंधू साखरे यांना श्रद्धांजली अर्पण करून आम्ही जिल्हा प्रशासन आणि शासनाचा निषेध करून सभागृहातून निघून गेलो, अशी माहिती पेण को-आॅप. अर्बन बँक विशेष कृती समितीचे सदस्य नरेन जाधव यांनी दिली. त्यानंतर दुपारी २ वाजता पेण अर्बनच्या विशेष कृती समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी नरेन जाधव यांच्यासह कोणीही अशासकीय सदस्य उपस्थित नव्हते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक सी.एस. जुवेकर, जिल्हा उपनिबंधक पी.एम. खोडका, जिल्हा विशेष लेखा परीक्षक यू. जी. तुपे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत राजे, वसुली अधिकारी काशिनाथ गावंड, सक्त संचालनालयाचे उपसंचालक प्रकाश जाधव, पोलीस उपधीक्षक (गृह) विजय पांढरपट्टे, तपास अधिकारी धनाजी क्षीरसागर, सह निबंधक पेण बी.के. हांडे, सनदी लेखापाल व्ही.एस. वैद्य उपस्थित होते.>मालमत्ता जप्तीसाठी नियुक्तीची सूचनादरम्यान, सक्त संचालनालय, पोलीस व सीबीआय यांनी केलेल्या कारवाईत १२८ बोगस कर्जखात्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी ४५ कोटी ८३ लाख रु पयांची वसुली झाली असून १४७ मालमत्ता अधिसूचित करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत पोलीस तपास यंत्रणेमार्फत गैरव्यवहारांतील मालमत्तांचा शोध घेऊन त्या मालमत्ता जप्त करण्याबाबत सक्षम प्राधिकाºयांनी अधिसूचना लवकरात लवकर जारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी बैठकीत केली.>२,९६६ शिल्लक कर्जखात्यांची वसुली सुरूबँकेने ३१ जुलै २०१८ अखेर १६७ कोटी ७८ लाख रु पयांची कर्ज वसुली केली असून, एकूण ७ हजार ९७० कर्जखात्यांपैकी पाच हजार कर्जखाती बंद करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत २ हजार ९६६ कर्जखाती शिल्लक असून त्यांच्याकडून वसुलीची कारवाई सुरू आहे. त्यात ५० हजार रु पयांच्या वरच्या रकमेची ७८७ कर्जखात्यांमधील ५१ कोटी ८ लाख रु पयांची वसुली करण्यासाठी बँकेच्याच ५० कर्मचाºयांचे कृती दल गठीत करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.>६६ कोटी ३२ लाखांची रक्कम ठेवीदारांना परतमुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी व अपहृत रकमेच्या वसुलीसाठी विशेष कृती समिती गठीत करण्यात आली आहे. बँकेत झालेल्या ७५८ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सद्यस्थितीत १ लाख ७१ हजार ३६९ ठेवीदारांच्या ६१४ कोटी ५० लाख रकमेच्या ठेवी परत करावयाच्या आहेत. आतापर्यंत बँकेने केवळ ६६ कोटी ३२ लाखांची रक्कम ठेवीदारांना परत केल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

टॅग्स :MONEYपैसा