शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
2
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
3
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
4
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
5
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
6
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
7
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
8
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
9
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
10
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
11
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
12
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
13
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
14
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
15
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
16
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
17
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
18
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
19
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
20
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

चुकीचे, खोटे पंचनामे केल्यास कारवाई; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 04:21 IST

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

रायगड : खोटे अथवा चुकीचे पंचनामे करुन कोणी मदत लाटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. निसर्ग वादळात घरांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे. त्यातील ७६ टक्के नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरीत मदत लवकरच देण्यात येईल. काही ठिकाणी सात बारावर अधिक नावे असणे, बँकेतील खाते नंबर चूकीचा असणे अशा काही तांत्रीक चुकांमुळे मदत मिळण्यास अडचण येत आहे. मात्र नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. मासेमारी बोटींचे, जाळ्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी निधीची गरज असल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

कोरोनाचा धोका वाढत आहे. प्रशासनाने तीन हजार खाटांचे नियोजन केले आहे. १०० दिवस नागरिकांनी साथ दिली आता पुढील १०० दिवस कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे, तरच आपण कोरोना विरोधातील युध्द जिंकू असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.कोरोनामुळे लॉकडाऊन हा उपाय नाही

  • लॉकडाऊन आणि कंपनी बंद करणे हा कायमस्वरुपी उपाय नाही. त्यामुळे लॉकडाऊन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जेएसडब्ल्यू, सुदर्शन दिपक फटीर्लायझर, रिलायन्स अशा विविध कंपन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यासाठी त्या कंपन्यांच बंद करणे योग्य ठरणार नाही.
  • तसे केले तर कोरोनामुळे कमी आणि भूकमारीने जास्त मृत्यू होतील असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी किमान दोन खाटा राखून ठेवाव्यात. त्याचे बिल महात्मा फुले जन आरोग्य अभियान योजनेतून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होणारमाणगाव, म्हसळा, रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यातील १९० गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. ५ जुलैपर्यंत माणगाव, म्हसळा, रोहा तर श्रीवर्धन तालुक्यात १२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस