शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
2
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
3
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
4
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
5
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
6
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
7
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
8
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
9
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
10
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
11
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
12
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
13
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
14
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
15
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
16
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
17
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
18
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
19
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
20
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे, खोटे पंचनामे केल्यास कारवाई; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 04:21 IST

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

रायगड : खोटे अथवा चुकीचे पंचनामे करुन कोणी मदत लाटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. निसर्ग वादळात घरांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे. त्यातील ७६ टक्के नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरीत मदत लवकरच देण्यात येईल. काही ठिकाणी सात बारावर अधिक नावे असणे, बँकेतील खाते नंबर चूकीचा असणे अशा काही तांत्रीक चुकांमुळे मदत मिळण्यास अडचण येत आहे. मात्र नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. मासेमारी बोटींचे, जाळ्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी निधीची गरज असल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

कोरोनाचा धोका वाढत आहे. प्रशासनाने तीन हजार खाटांचे नियोजन केले आहे. १०० दिवस नागरिकांनी साथ दिली आता पुढील १०० दिवस कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे, तरच आपण कोरोना विरोधातील युध्द जिंकू असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.कोरोनामुळे लॉकडाऊन हा उपाय नाही

  • लॉकडाऊन आणि कंपनी बंद करणे हा कायमस्वरुपी उपाय नाही. त्यामुळे लॉकडाऊन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जेएसडब्ल्यू, सुदर्शन दिपक फटीर्लायझर, रिलायन्स अशा विविध कंपन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यासाठी त्या कंपन्यांच बंद करणे योग्य ठरणार नाही.
  • तसे केले तर कोरोनामुळे कमी आणि भूकमारीने जास्त मृत्यू होतील असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी किमान दोन खाटा राखून ठेवाव्यात. त्याचे बिल महात्मा फुले जन आरोग्य अभियान योजनेतून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होणारमाणगाव, म्हसळा, रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यातील १९० गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. ५ जुलैपर्यंत माणगाव, म्हसळा, रोहा तर श्रीवर्धन तालुक्यात १२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस