शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

नेरळमध्ये बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 06:29 IST

महिनाभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया सुमारे ३०० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई

नेरळ : शहरात तसेच परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरू केली असून बेशिस्त वाहनचालकांना शिस्तीचा डोस दिला जात आहे. महिनाभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया सुमारे ३०० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईकेली असून त्यांच्याकडून सुमारे ९० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे उल्लंघन करणाºया चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकी चालकांवर बेधडक करवाई करण्यात येत असून त्यांच्याकडून दंडही वसूल केला जात आहे. मात्र काही महिन्यांपासून नेरळ शहर व परिसरात ही कारवाई थंडावली होती. पुन्हा या कारवाईला सुरुवात झाली आहे. नाकानाक्यावर नाकाबंदी करून हेल्मेट न घालणे, वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे, वाहन वेगाने चालवणे, गणवेश न घालणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वाहनांची कागदपत्रे नसणे, ट्रीपल सीट, दारू पिवून गाडी चालवणे अशा प्रकारे वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईतून दंडही वसूल केला जात आहे. परंतु वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, वाहनांवरून फॅन्सी नंबर प्लेट अशा वाहन चालकांवर कारवाई होता दिसत नाही. तसेच नेरळ शहरात अनेक रिक्षा स्टँड असून सुमारे ५००हून अधिक रिक्षाचालक आहेत, परंतु मोजके रिक्षाचालक सोडले तर अनेक रिक्षाचालक गणवेश घालत नसल्याचे चित्र आहे.तसेच नेरळ शहरात ही कारवाई सुरू असली तरी नेरळ बाजारपेठ तसेच नेरळ बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने लावली जात असल्याने प्रवासी व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नेरळ बाजारपेठेत आणि नेरळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाहनचालक कशाही रिक्षा लावत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे आणि त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष दिले तर अधिक चांगले होईल अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे.गेल्या महिनाभरात सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक शिओळे, सुभाष पाटील, आशिष कराळ यांनी नेरळ शहरात सुमारे ३०० वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे ८६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबाबत वाहतूक पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Raigadरायगड