शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

आमटी, वरणाच्या फोडणीचा गृहिणींना लागतोय ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 01:13 IST

लसणाचे द्विशतक : कोथिंबीर ९० पार, तर कांदा ८० च्या घरात

अलिबाग/पेण/दासगाव : परतीच्या पावसाने पिक नष्टी झाली आहेत. बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने आता पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. कांदा ८० च्या घरात गेला आहे, तर कोंथींबीरच्या एका जुडीने नव्वदी पार केली आहे. लसणाने द्वीशतक ठोकल्याने आमटी आणि वरणाच्या फोडणीचा गृहीणींना ठसका लागत आहे. पावसाचे सावट पुढील काही दिवस असेच राहील्यास सर्वसमान्यांना पालेभाज्या खरेदी करणे मुश्कील होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी आणि परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार उडवून दिला आहे. पावसाचा फटका हा शेतीला मोठ्या प्रमाणात बसल्याने उभ्या शेतातील पीक वाया गेले आहे. पावसाच्या तडाख्यापासून पालेभाज्याही वाचू शकलेल्या नाहीत. त्यामुळे बाजारपेठेमध्ये पाल्याभाज्यांना मागणी आहे मात्र उत्पादनावरच थेट परिणाम झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात आवक कमालीची घटली आहे. पाल्याभाज्या या नियमीतपणे जेवणामध्ये वापरल्या जातात. आवक घटल्याने पालेभाज्यांचे दरही चांगलेच कडाडले आहेत. कोथींबीरच्या जुडीने १०० गाठली आहे, तर कांदा हा किलोला ८० रुपयांच्या घरात गेला आहे. लसूण २०० रुपये किलोने विकला जात आहे. मिरचीचा दर हा ६० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे आमटी आणि वरणाच्या फोडणीेचा ठसका गृहीणींना लागला आहे. दर कडाडले आहेत आणि अशीच परिस्थीत राहील्यास जेवणातून महत्वाच्या भाज्या गायब झाल्यास नवल वाटायला नको.परतीच्या पावसामुळे शेतातील पिक वाया गेले आहे. त्यामुळे मागणी असूनही तसा पुरवठा होत नाही. त्यामुळे दर कडाडले आहेत, असे एका भाजी विक्रेत्याने सांगितले. पावसाचा कगर सुरुच राहील्यास दरांनेमध्ये आणखी वाढ होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. जेवणामध्ये नियमीतपणे कोथींबीर, मिरची, लसूण, टॉमेटो, कांदा याची आवश्यकता असते. मात्र दर गगणाला भिडल्याने किचन कॅबीनेटमधील बजेट पुरते कोलमडले आहे. काही दिवसांनी आमटी आणि वरणाच्या फोडणीतून हे बाद झाल्यास खमंग फोडणी कशी बसणार अशी खंत अलिबाग येथील स्वप्नाली फोडसे (गृहीणी) यांनी लोकमत जवळ व्यक्त केली.दरम्यान, पालेभांज्यांचे दर वाढले असताना अद्यापही काही हॉटेल, खानावळ, वडापावचे स्टॉल येथील अन्नपदार्थांच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही.च्पश्चिम महाराष्ट्रांतील सांगली, कोल्हापुर, पुणे, सातारा, या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने खरीप पिका बरोबर भाजीपाल्याचे पीक देखिल पावसामुळे वाहून गेले. त्याचा परिणाम शहरी बाजारपेठेमध्ये झालेला दिसून येत आहे.च्महाडमध्ये लागणारा भाजीपाला हा वाई, पुणे, सासवड, शिरवळ, निरा येथुन येतो. परंतु गेल्या कांही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीचे उत्पन्न घटले आहे. मुख्य बाजारपेठेत भाजीपाला आणि कांदा आवक थांबल्याने दरामध्ये चाळीस टक्या पेक्षा अधिक वाढ झाली.पालेभाज्यांचे दरआताचे दर आधीचे दर(किलो)रु. (किलो)रु.कांदा ८० ३०लसूण २००-२२० १२०कोथींबीर (जुडी) ८०-१०० २०हिरवी मिरची ५०-६० २०बटाटा ३० २०मटार १४०-१६० १००-१२०वाल ८०-९० ६०-७०टॉमेटो ५० ३०-४०मेथी (जुडी) ४०-५० १५-२०भेंडी ६०-८० ३०-४०वांगी ४०-६० ३०-३५

टॅग्स :Raigadरायगड