शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आमटी, वरणाच्या फोडणीचा गृहिणींना लागतोय ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 01:13 IST

लसणाचे द्विशतक : कोथिंबीर ९० पार, तर कांदा ८० च्या घरात

अलिबाग/पेण/दासगाव : परतीच्या पावसाने पिक नष्टी झाली आहेत. बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने आता पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. कांदा ८० च्या घरात गेला आहे, तर कोंथींबीरच्या एका जुडीने नव्वदी पार केली आहे. लसणाने द्वीशतक ठोकल्याने आमटी आणि वरणाच्या फोडणीचा गृहीणींना ठसका लागत आहे. पावसाचे सावट पुढील काही दिवस असेच राहील्यास सर्वसमान्यांना पालेभाज्या खरेदी करणे मुश्कील होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी आणि परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार उडवून दिला आहे. पावसाचा फटका हा शेतीला मोठ्या प्रमाणात बसल्याने उभ्या शेतातील पीक वाया गेले आहे. पावसाच्या तडाख्यापासून पालेभाज्याही वाचू शकलेल्या नाहीत. त्यामुळे बाजारपेठेमध्ये पाल्याभाज्यांना मागणी आहे मात्र उत्पादनावरच थेट परिणाम झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात आवक कमालीची घटली आहे. पाल्याभाज्या या नियमीतपणे जेवणामध्ये वापरल्या जातात. आवक घटल्याने पालेभाज्यांचे दरही चांगलेच कडाडले आहेत. कोथींबीरच्या जुडीने १०० गाठली आहे, तर कांदा हा किलोला ८० रुपयांच्या घरात गेला आहे. लसूण २०० रुपये किलोने विकला जात आहे. मिरचीचा दर हा ६० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे आमटी आणि वरणाच्या फोडणीेचा ठसका गृहीणींना लागला आहे. दर कडाडले आहेत आणि अशीच परिस्थीत राहील्यास जेवणातून महत्वाच्या भाज्या गायब झाल्यास नवल वाटायला नको.परतीच्या पावसामुळे शेतातील पिक वाया गेले आहे. त्यामुळे मागणी असूनही तसा पुरवठा होत नाही. त्यामुळे दर कडाडले आहेत, असे एका भाजी विक्रेत्याने सांगितले. पावसाचा कगर सुरुच राहील्यास दरांनेमध्ये आणखी वाढ होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. जेवणामध्ये नियमीतपणे कोथींबीर, मिरची, लसूण, टॉमेटो, कांदा याची आवश्यकता असते. मात्र दर गगणाला भिडल्याने किचन कॅबीनेटमधील बजेट पुरते कोलमडले आहे. काही दिवसांनी आमटी आणि वरणाच्या फोडणीतून हे बाद झाल्यास खमंग फोडणी कशी बसणार अशी खंत अलिबाग येथील स्वप्नाली फोडसे (गृहीणी) यांनी लोकमत जवळ व्यक्त केली.दरम्यान, पालेभांज्यांचे दर वाढले असताना अद्यापही काही हॉटेल, खानावळ, वडापावचे स्टॉल येथील अन्नपदार्थांच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही.च्पश्चिम महाराष्ट्रांतील सांगली, कोल्हापुर, पुणे, सातारा, या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्याने खरीप पिका बरोबर भाजीपाल्याचे पीक देखिल पावसामुळे वाहून गेले. त्याचा परिणाम शहरी बाजारपेठेमध्ये झालेला दिसून येत आहे.च्महाडमध्ये लागणारा भाजीपाला हा वाई, पुणे, सासवड, शिरवळ, निरा येथुन येतो. परंतु गेल्या कांही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीचे उत्पन्न घटले आहे. मुख्य बाजारपेठेत भाजीपाला आणि कांदा आवक थांबल्याने दरामध्ये चाळीस टक्या पेक्षा अधिक वाढ झाली.पालेभाज्यांचे दरआताचे दर आधीचे दर(किलो)रु. (किलो)रु.कांदा ८० ३०लसूण २००-२२० १२०कोथींबीर (जुडी) ८०-१०० २०हिरवी मिरची ५०-६० २०बटाटा ३० २०मटार १४०-१६० १००-१२०वाल ८०-९० ६०-७०टॉमेटो ५० ३०-४०मेथी (जुडी) ४०-५० १५-२०भेंडी ६०-८० ३०-४०वांगी ४०-६० ३०-३५

टॅग्स :Raigadरायगड