शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

रायगडच्या किनाऱ्यांना आनंदाची लहर

By निखिल म्हात्रे | Updated: December 31, 2023 18:33 IST

मागील सात दिवस पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांवर वास्तव्यास आहेत.

 अलिबाग : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडच्या किनारपट्टीसह धार्मिक स्थळही सज्ज झाली आहेत. पाली येथील बल्लाळेश्वर व महड येथील वरद-विनायकाच्या दर्शनासाठी भक्तांची नववर्षाच्या पहील्याच दिवशी मोठी गर्दी पहावयास मिळते. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने अधीच खबरदारी घेतली आहे. तर पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या अलिबाग, किहीम, नागाव, आक्षी, वरसोली, मुरुड, काशिद, आवास आदी ठिकाणची एक महिना आधीच हॉटेल, काॅटेज बुकिंग फुल्ल आहेत. त्यामुळे आयत्यावेळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला.

लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे जिल्हा आता भरून गेला आहे. मागील सात दिवस पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांवर वास्तव्यास आहेत. तर ऐनवेळी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ शकते, तसेच त्यांना मनमानी पॅकेज घ्यावे लागू शकते. याची ही काही ठिकाणी आधीच दखल घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे कौटुंबिक पर्यटनावरच येथे जास्त भर आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, कोशिद, श्रीवर्धन तालुक्यांतील किनारपट्टीवर ईयरएंड ला पर्यटनासाठी मोठी गर्दी असते. साधारण तिन लाखांहून अधिक पर्यटक चार ते पाच दिवसांत जिल्ह्याच्या किनारपट्टीला भेट देतात. यात सर्वाधिक पसंती नागाव, मुरुड काशीद या ठिकाणांना असते. महिनाभर आधीच बहुसंख्य हॉटेलचे बुकिंग फुल झालेले आहे.

याआधी एका रात्रीसाठी सर्वाधिक पॅकेज 10 हजार रुपये असायचे. मात्र यामध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ते बुकही झाले आहेत. छोटी मोठी हॉटेलही हाउसफुल झाल्याचे चित्र आहे. अलिबाग, नागाव आक्षी, किहीम, आवास, सासवणे, काशीद, दिव्याआगर, श्रीवर्धन याबरोबरच किनारपट्टीलगतच्या गावांतही निवासव्यवस्था उपलब्ध असून बहुतेक ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने बुकिंग झाल्याची माहिती आहे. पर्यटन व्यावसायिकांनी पॅरासिलिंग, बनाना राइड, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग असे प्रकार पर्यटकांसाठी यापूर्वीच खुले केले आहेत.

पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक केटरर्स, खाणावळी यांचीही लगबग सुरू आहे. मोदक,डाळ - भात, पुरणपोळी अशा शाकाहारी पदार्थांबरोबरच मटण वडे, कोंबडीवडे, तसेच ताज्या माशांपासून बनविलेले विविध पदार्थ अशा खास कोकणातील रुचकर आहाराची उपलब्धता करून पर्यटकांची हौस भागविली जाणार आहे. पर्यटकांना वाहतुकीच्या समस्येपासून सुटकारा मिळण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. तळीरामांवरही नजर ठेवण्यासाठी पाच पथक आहेत. बल्लाळेश्वर व वरद-विनायकाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक यावर्षी एक महिन्यापूर्वीच नववर्षाच्या जल्लोषासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अलिबाग तालुक्यातील कॉटेजेस बुक केले आहेत. त्यामुळे आयत्यावेळी आलेल्या पर्यटकांना रूम उपलब्ध करून देता आली नाही. शुक्रवारी संध्याकाळपासूनच पर्यटकांनी हजेरी लावली आहे. समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची जत्रा भरली आहे.राजू बानकर, एबी व्हीला, व्यावसायिक

टॅग्स :Raigadरायगड