शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

४०-५० घरं ढिगाऱ्याखाली! इर्शाळवाडीवर कोसळला दु:खाचा डोंगर; रात्री काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 09:01 IST

इर्शाळगडाजवळ ही आदिवासी लोकांची वस्ती होती. तेथील ४०-५० घरांवर ही दरड कोसळली आहे

रायगड – गेल्या २४ तासांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. याठिकाणी २५० लोकांची वस्ती असून त्यातील १०० लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. रात्रीपासून दुर्घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

या दुर्घटनेबाबत पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, रात्री ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. रात्रीपासून पालकमंत्री या नात्याने मी स्वत: आणि प्रशासन घटनास्थळी आहोत. आतापर्यंत २६ लोकांना रेस्क्यू केले आहे. त्यातील ४ मृत आहेत. जखमींना नवी मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काळोख असल्याने काही वेळ रेस्क्यू थांबले होते. आता पुन्हा पहाटेपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत इर्शाळगडाजवळ ही आदिवासी लोकांची वस्ती होती. तेथील ४०-५० घरांवर ही दरड कोसळली आहे. सध्या घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. इर्शाळगडावर पायथ्याशी, मध्याशी आणि उंचावर अशा तीन वस्त्या आहेत. सर्वात उंचावर असलेल्या वस्तीवर ही दरड कोसळली आहे. पाऊस सुरू असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे घटनास्थळी पोहचले आहेत तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पोहचणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे ऑनफिल्ड असून उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहचले. त्याठिकाणाहून अजित पवारांनी या दुर्घटनेचा आढावा घेतला.

रात्री नेमकं काय घडलं?

रात्री पाऊस पडत होता, आम्ही सगळे घरात झोपलो होतो. तितक्यात मोठा आवाज झाला, त्यामुळे आम्ही घाबरलो, तातडीनं मुलाबाळांना घेऊन घरातून बाहेर पडलो. बाहेर आलो तेव्हा अनेक घर दरडीखाली गेल्याचे दिसून आले. मोठी झाडे पडली होती. आमचे घर खचले आम्ही तिथून खाली आलो असं या दुर्घटनेत वाचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

टॅग्स :landslidesभूस्खलनEknath Shindeएकनाथ शिंदेRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण