शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

जिल्ह्यात तीन वर्षांत ९६७ बालमृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:30 IST

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, अपुरा औषध पुरवठा, सोनोग्राफी मशिन्स बंद अशा विविध कारणांमुळे माता-बाल मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, अपुरा औषध पुरवठा, सोनोग्राफी मशिन्स बंद अशा विविध कारणांमुळे माता-बाल मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याबाबत २१ ऑगस्ट रोजी ‘बालमृत्यू रोखण्याचे आव्हान’ ही बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. त्यामुळे जिल्ह्याबरोबरच राज्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली होती.या बातमीच्या आधारे विधिमंडळात दाखल तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी हे खरे असल्याचे असे मान्य केले असून सदरप्रकरणी अतिरिक्त संचालक, कुटुंब कल्याण, पुणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड यांना १२ नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये सखोल चौकशी करण्याबाबत कळविल्याचेही स्पष्ट केले आहे.मुंबईतील समर्थन संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते रुपेश किर यांनी २४ आॅगस्ट २०१८ रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत,आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना लेखी तक्रार निवेदने दिली होती. या गंभीर प्रश्नी अपेक्षित कारवाई होत नसल्याने किर यांनी लक्षात आणून दिल्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी याबाबत तारांकित प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात दाखल केला होता. त्यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी उत्तर दिले.कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी या बालमाता मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांना गेल्या १२ नोव्हेंबर रोजी चौकशीचे आदेश दिले. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून माता-बाल मृत्यूचे समोर आलेले आकडे अधिक गंभीर आहेत.तीन वर्षात ९३७ बालकांचा मृत्यू झाला तर ८१ मातांना प्रसूती दरम्यान वा प्रसूती पश्चात प्राण गमवावे लागले आहेत. तरी आपण आपल्या स्तरावरुन सदर प्रकरणी सखोल चौकशी करुन चौकशी अहवाल सादर करावाअसे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.>चौकशी सुरूबालमृत्यू व गरोदर मातांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरु असून, ती पूर्ण होताच अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी दिली. हे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.