शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

जिल्ह्यात तीन वर्षांत ९६७ बालमृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:30 IST

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, अपुरा औषध पुरवठा, सोनोग्राफी मशिन्स बंद अशा विविध कारणांमुळे माता-बाल मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, अपुरा औषध पुरवठा, सोनोग्राफी मशिन्स बंद अशा विविध कारणांमुळे माता-बाल मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याबाबत २१ ऑगस्ट रोजी ‘बालमृत्यू रोखण्याचे आव्हान’ ही बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. त्यामुळे जिल्ह्याबरोबरच राज्यातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली होती.या बातमीच्या आधारे विधिमंडळात दाखल तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी हे खरे असल्याचे असे मान्य केले असून सदरप्रकरणी अतिरिक्त संचालक, कुटुंब कल्याण, पुणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड यांना १२ नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये सखोल चौकशी करण्याबाबत कळविल्याचेही स्पष्ट केले आहे.मुंबईतील समर्थन संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते रुपेश किर यांनी २४ आॅगस्ट २०१८ रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत,आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना लेखी तक्रार निवेदने दिली होती. या गंभीर प्रश्नी अपेक्षित कारवाई होत नसल्याने किर यांनी लक्षात आणून दिल्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी याबाबत तारांकित प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात दाखल केला होता. त्यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी उत्तर दिले.कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व शालेय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी या बालमाता मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांना गेल्या १२ नोव्हेंबर रोजी चौकशीचे आदेश दिले. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून माता-बाल मृत्यूचे समोर आलेले आकडे अधिक गंभीर आहेत.तीन वर्षात ९३७ बालकांचा मृत्यू झाला तर ८१ मातांना प्रसूती दरम्यान वा प्रसूती पश्चात प्राण गमवावे लागले आहेत. तरी आपण आपल्या स्तरावरुन सदर प्रकरणी सखोल चौकशी करुन चौकशी अहवाल सादर करावाअसे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.>चौकशी सुरूबालमृत्यू व गरोदर मातांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरु असून, ती पूर्ण होताच अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी दिली. हे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.