शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

रोजगारनिर्मितीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण; फळ लागवड मोहिमेतून मिळतो रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:55 IST

मजुरी मिळावी ही प्रत्येक मजुराची दैनंदिन अपेक्षा असते. त्यामुळे हा अकुशल कामगार फळबाग लागवड योजनेकडे वळला.

दत्ता म्हात्रेपेण : फळ लागवड योजना रोजगार हमी योजनेस समाविष्ट केल्याने रायगड जिल्ह्यात या योजनेतून रोजगार उपलब्ध होण्यास चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्याला देण्यात आलेले मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलेले आहे.

कोकणात तसेच रायगडात रोजगार हमी योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता; परंतु रोजगार निर्मितीच्या अभावी फळबागाही लागवड योजनेतून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन २ लाख ३८ हजार ९९३ मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात मजुरांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध असताना देखील बाजारात मंदी असल्याने नाका कामगारांना मिळणारे ४०० ते ५०० रुपयांची मजुरीअभावी त्यांना माघारी परत फिरावे लागत होते. मजुरी मिळावी ही प्रत्येक मजुराची दैनंदिन अपेक्षा असते. त्यामुळे हा अकुशल कामगार फळबाग लागवड योजनेकडे वळला. दिवसापोटी मिळणारे मजुरी काम नसलेल्या हंगामात त्यांना या योजनतून उपलब्ध झाली. दिवसाला २०० ते २५० रुपये मजुरीचा दर मिळाला व कामाचा ही एवढा मोठा ताण नसल्याने फळबाग लागवड योजनेचे कामात मनुष्य दिवस रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट प्रशासनाला साध्य करता आले.

जिल्ह्याला रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी २ लाख ४७ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते दिलेल्या उद्दिष्टाच्या ९० टक्के भरते. जिल्ह्यात १३ हजार ३६५ मजुरांनी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची मागणी केली होती. त्यापैकी १२ हजार ६५६ मजुरांना रोजगार उपलब्ध झाले.

अकुशल कामगारांना कामजिल्ह्यात औद्योगिकीकरण झालेले असताना कंपन्यांच्या साइटवर मिळणारा रोजगार अकुशल कामगारांसाठी मोठा आहे. परंतु कामाअभावी घरी बसण्यापेक्षा या योजनेत काम करण्यावर अकुशल मजुरांनी भर दिल्याने सद्यस्थितीत रोजगार हमी योजनेला रोजगार निर्मिती करण्यात यश प्राप्त झाले.