शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

रोजगारनिर्मितीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण; फळ लागवड मोहिमेतून मिळतो रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:55 IST

मजुरी मिळावी ही प्रत्येक मजुराची दैनंदिन अपेक्षा असते. त्यामुळे हा अकुशल कामगार फळबाग लागवड योजनेकडे वळला.

दत्ता म्हात्रेपेण : फळ लागवड योजना रोजगार हमी योजनेस समाविष्ट केल्याने रायगड जिल्ह्यात या योजनेतून रोजगार उपलब्ध होण्यास चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्याला देण्यात आलेले मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलेले आहे.

कोकणात तसेच रायगडात रोजगार हमी योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता; परंतु रोजगार निर्मितीच्या अभावी फळबागाही लागवड योजनेतून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन २ लाख ३८ हजार ९९३ मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात मजुरांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध असताना देखील बाजारात मंदी असल्याने नाका कामगारांना मिळणारे ४०० ते ५०० रुपयांची मजुरीअभावी त्यांना माघारी परत फिरावे लागत होते. मजुरी मिळावी ही प्रत्येक मजुराची दैनंदिन अपेक्षा असते. त्यामुळे हा अकुशल कामगार फळबाग लागवड योजनेकडे वळला. दिवसापोटी मिळणारे मजुरी काम नसलेल्या हंगामात त्यांना या योजनतून उपलब्ध झाली. दिवसाला २०० ते २५० रुपये मजुरीचा दर मिळाला व कामाचा ही एवढा मोठा ताण नसल्याने फळबाग लागवड योजनेचे कामात मनुष्य दिवस रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट प्रशासनाला साध्य करता आले.

जिल्ह्याला रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी २ लाख ४७ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते दिलेल्या उद्दिष्टाच्या ९० टक्के भरते. जिल्ह्यात १३ हजार ३६५ मजुरांनी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची मागणी केली होती. त्यापैकी १२ हजार ६५६ मजुरांना रोजगार उपलब्ध झाले.

अकुशल कामगारांना कामजिल्ह्यात औद्योगिकीकरण झालेले असताना कंपन्यांच्या साइटवर मिळणारा रोजगार अकुशल कामगारांसाठी मोठा आहे. परंतु कामाअभावी घरी बसण्यापेक्षा या योजनेत काम करण्यावर अकुशल मजुरांनी भर दिल्याने सद्यस्थितीत रोजगार हमी योजनेला रोजगार निर्मिती करण्यात यश प्राप्त झाले.