शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

श्रीवर्धन तालुक्यात ९० टक्के मदत वाटप; ३२ कोटी ४५ लाख निधी प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 00:51 IST

वादळाने तालुक्यातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांच्या भिंती पडलेल्या आहेत, घरावरची कौले व पत्रे पूर्णपणे फुटलेली आहेत. अनेक घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.

श्रीवर्धन : निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, व्यापारी ते नोकरदार सर्वांनाच चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले, हातातील उपजीविकेचे साधन नाहीसे झाले. अशा कठीण प्रसंगी सर्वसामान्यांना सावरण्यासाठी सरकारकडून पंचनाम्यानुसार मदतनिधीचे वाटप करण्यात आले. तालुक्यात ३२ कोटी ४५ लाख रुपयांच्या मदतनिधीचे वाटप करण्यात आले आहे.वादळाने तालुक्यातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांच्या भिंती पडलेल्या आहेत, घरावरची कौले व पत्रे पूर्णपणे फुटलेली आहेत. अनेक घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. घरांसाठी अंशत: मदतनिधी १५ हजार रु पये देण्यात आला आहे, तसेच पूर्ण घर पडले असेल, तर दीड लाख रुपये मदतनिधी देण्यात आली आहे. तालुक्यातील १९ हजार १३३ व्यक्तींना २६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ज्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला, अशा १०७ व्यक्तींना २३ लाख ८० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील क्षतिग्रस्त १२७ दुकानदारांना १० लाख रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे, तसेच घरातील कपडे, धान्य आणि भांडी यांचे नुकसान झालेल्या ४,४८९ नागरिकांना तीन कोटी १७ लाख ६० हजार रुपये मदतनिधीची रक्कम देण्यात आलेली आहे. तालुक्यातील १९६ होड्यांच्या नुकसानीसाठी संबंधित व्यक्तींना आठ लाख ९६ हजार ६०० रुपये मदतनिधी देण्यात आलेला आहे, अशी माहिती प्राप्त झाली असून, ९० टक्के मदतनिधी वाटपाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित दहा टक्के काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे तहसीलदार सचिन गोसावी यांनी सांगितले.शेतकऱ्यांना लवकर मिळणार भरपाईमदतनिधीचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आलेला आहे. दुसºया टप्प्यामध्ये तालुक्यातील कृषी विभागाची मदतवाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या नारळ-सुपारीच्या बागांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. नारळ, सुपारी, केळी आणि आंबा या पिकांना वादळाचा फटका बसला आहे.अनेक सातबारांवरती एकापेक्षा जास्त व्यक्तींची नावे असल्याने, मदतनिधी देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सातबारावरील एका व्यक्तीकडून इतर व्यक्तींची ना हरकत घेतल्यानंतर मदतनिधी वाटपाचा मार्ग मोकळा होणार आहे. तालुक्यातील २,७३६ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे निदर्शनास येते आहे.श्रीवर्धन तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळाने बाधित झालेल्या प्रत्येक घटकापर्यंत शासनाचा मदतनिधी पाठविणे हे माझे दायित्व आहे. त्यानुसार, प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. लवकरच पूर्ण श्रीवर्धनमधील नुकसानग्रस्तांना मदतनिधीचे वाटप करण्यात येईल.- सचिन गोसावी, तहसीलदार श्रीवर्धनवादळानंतर असंख्य अडीअडचणींना सामोरे जात, महसूल, ग्रामविकास, शिक्षक, डेटा आॅपरेटर यांनी जनतेला मदतनिधी वाटप करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. बाधित प्रत्येक व्यक्तीपर्यंत मदतनिधी पाठविला जाईल, त्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.- अमित शेडगे, प्रांताधिकारी, श्रीवर्धनमाझ्या घराचा अंशत: मदतनिधी मला मिळालेला आहे. मात्र, नारळ-सुपारीचा मदतनिधी अद्याप मिळालेला नाही.- उदय आवळस्कर,नागरिक, श्रीवर्धनमाझे घर वादळात पडले आहे. मात्र, मला काहीच मदतनिधी मिळाला नाही.- गुलाब निगुडकर, महिला, श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड