शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

९६ गावांत पाणी पातळी घटली

By admin | Updated: April 20, 2017 03:43 IST

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वाढलेले तापमान, जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ९६ गावांतील भूजल पातळीत झालेली विक्रमी घट आणि पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील

जयंत धुळप, अलिबागगेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वाढलेले तापमान, जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ९६ गावांतील भूजल पातळीत झालेली विक्रमी घट आणि पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणे व जलाशय प्रकल्पात १५ एप्रिलअखेर शिल्लक राहिलेला सरासरी ३३.२८ टक्के उपयुक्त जलसाठा आणि जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १२ तालुक्यांत निष्पन्न दूषित जलनमुने या पार्श्वभूमीवर यंदाच्या उन्हाळ््यातील तीव्र जलदुर्भिक्ष आणि गंभीर पाणीटंचाई आता दृष्टिक्षेपात आली असून त्याचा मुकाबला करण्याकरिता जिल्हा प्रशासनास विशेष नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ९६ गावांमध्ये गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा नैसर्गिक भूजल पातळीत घट झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ३४ गावे महाड तालुक्यातील आहेत, तर उर्वरित पोलादपूर तालुक्यात २४, खालापूर तालुक्यात १८, तळा तालुक्यात १५, माणगाव तालुक्यात ३ तर कर्जत तालुक्यात दोन गावे आहेत. सप्टेंबर २०१६ अखेर संपलेल्या गतवर्षीच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात सरासरी अपेक्षित ३ हजार ३५० मिमी पर्जन्यमानापैकी ६.३४ टक्के कमी म्हणजे ३ हजार १३७ मिमी पाऊस झाल्याने या तालुक्यात पाणीटंचाईची झळ तीव्रतेने जाणवत आहे.गतवर्षीच्या मान्सूनमध्ये खालापूर तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित १४ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या धरणे आणि जलाशयांनी यंदाच्या तीव्र उन्हामुळे १५ एप्रिल रोजीच तळ गाठण्यास प्रारंभ केला आहे. लघु पाटबंधारे विभागाची जिल्ह्यात २८ धरणे व जलाशय असून, त्यामध्ये सद्यस्थितीत सरासरी ३३.२८ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत या धरणांमध्ये ३६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक होता. रायगड पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या या २८ धरणे व जलाशयांतील पाणी ८० गावांना पिण्यासाठी तर ४ हजार ६४८ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाकरिता वापरण्यात येते.मुरुड, तळा, रोहा, पेण, अलिबाग, सुधागड, खालापूर या तालुक्यातील धरणांमधील उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. यामुळे काही ठिकाणी पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. एप्रिलमध्येच पाण्याची अशी स्थिती असेल तर मे महिन्यात पाणी प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील १२ तालुक्यांत दूषित पाणी निष्पन्नएकीकडे पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष असतानाच उपलब्ध पाण्यापैकी जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील पाणी नमुने जलतपासणीत दूषित निष्पन्न झाल्याने, दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था जिल्ह्यातील काही गावांमध्ये झाली आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अशा दोन यंत्रणांच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ तालुक्यातील एकू ण ५२ प्राथमिक आरोग्य क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीकरिता घेण्यात येतात. मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील एकूण १३२४ जलनमुन्यांपैकी १३.१४ टक्के म्हणजे १७४ जलनमुने दूषित निष्पन्न झाले आहेत.