शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये ८० टक्के भातलावणी पूर्ण, तालुक्यात १,४१४ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 23:43 IST

सर्वात जास्त भातपीक हे तालुक्यातील आंबोली, शिघ्रे, तळेखार, सावली आदी ग्रामपंचात हद्दीत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भातपिकाला जास्त पावसाची गरज असते.

मुरुड : तालुक्यात सततधार पाऊस असून, हा पाऊस भात पिकाला पोषक असल्याने सर्व शेतकऱ्यांच्या शेतीमधील लावणीची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. मुरुड तालुक्यात सर्वात जास्त पावसाळी हंगामात भाताचे पीक लावले जाते. सुमारे ३,३०० हेक्टर क्षेत्रात भातपीक घेतले जाते. पावसाळा हा नियोजित वेळेत सुरू झाल्याने, भाताचे राब लवकर तयार होऊन आता सर्वत्र लावणी सुरू असून, शेतकरी सहकुटुंब कामात व्यस्त झालेला दिसून येत आहे.सर्वात जास्त भातपीक हे तालुक्यातील आंबोली, शिघ्रे, तळेखार, सावली आदी ग्रामपंचात हद्दीत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भातपिकाला जास्त पावसाची गरज असते. त्यामुळे येथे भातपिकाला खूप महत्त्व दिले जाते. मुरुड तालुक्यात आतापर्यंत १,४४१ मिलिमीटर एवढा पाऊस पडल्याने, येथील विहिरी, तलाव, नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे, शेतामध्यही खूपसे पाणी साचले आहे. त्यामुळे असे पाणी भातशेतीला आवश्यक असल्याने भातलावणीच्या कामाला वेग प्राप्त झाला आहे.उत्पादित भाताचा येथील शेतकरी संपूर्ण वर्षभर आपल्या कुटुंबासाठी वापर करून, अतिरिक्त उत्पादित भात विकून कुटुंबाचे पालनपोषण करीत असतो. येथे एका दिवसात १५४ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. शेतीसाठी माणसे अपुरी पडली, तर मजुरीवर माणसे घेऊन सध्या लावणीची कामे जलद गतीने पूर्ण होताना दिसत आहेत. किसान क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीधर जंजिरकर यांनी तालुक्यातील ८० टक्के भातलावणी पूर्ण झाली असल्याचे सांगितले.भाताच्या पिकासाठी विमा हप्ता : १० गुंठ्यासाठी ९१ रुपये, एकरी ३६४ रु., तर हेक्टरी ९१० रुपये असून, हेक्टरी ४५,५०० रु पये विमा संरक्षण दिले जाणार आहे. नाचणी पिकाच्या १० गुंठ्यांसाठी विमाहप्ता ४० रुपये, एकरी १६० रुपये व हेक्टरी ४०० रुपये असून, विम्याचे संरक्षण हेक्टरी २०,००० रुपये आहे. या विमा योजनेची माहिती कृषी सहायकांमार्फत गावोगावी देण्यात येत असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे विश्वनाथ अहिरे यांनी सांगितले.शेतकºयांना आवाहनभात व नागली पीक घेणाºया शेतकºयांना ऐच्छिक कुळानेवा भाडेपट्टीने शेती कसणाºयांवर पेरणी ते काढणीदरम्यान नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास पंतप्रधान पीकविमा योजनेचे संरक्षण प्राप्त करण्यासाठी सरकारी सेवा केंद्रावर आवेदन पत्रे येत्या ३१ जुलैपर्यंतसादर करून लाभ घेण्याचे आवाहन मुरुड तालुकाकृषी अधिकारी विश्वनाथ आहिरे यांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड