शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

मुरुडमध्ये ८० टक्के भातलावणी पूर्ण, तालुक्यात १,४१४ मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 23:43 IST

सर्वात जास्त भातपीक हे तालुक्यातील आंबोली, शिघ्रे, तळेखार, सावली आदी ग्रामपंचात हद्दीत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भातपिकाला जास्त पावसाची गरज असते.

मुरुड : तालुक्यात सततधार पाऊस असून, हा पाऊस भात पिकाला पोषक असल्याने सर्व शेतकऱ्यांच्या शेतीमधील लावणीची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. मुरुड तालुक्यात सर्वात जास्त पावसाळी हंगामात भाताचे पीक लावले जाते. सुमारे ३,३०० हेक्टर क्षेत्रात भातपीक घेतले जाते. पावसाळा हा नियोजित वेळेत सुरू झाल्याने, भाताचे राब लवकर तयार होऊन आता सर्वत्र लावणी सुरू असून, शेतकरी सहकुटुंब कामात व्यस्त झालेला दिसून येत आहे.सर्वात जास्त भातपीक हे तालुक्यातील आंबोली, शिघ्रे, तळेखार, सावली आदी ग्रामपंचात हद्दीत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भातपिकाला जास्त पावसाची गरज असते. त्यामुळे येथे भातपिकाला खूप महत्त्व दिले जाते. मुरुड तालुक्यात आतापर्यंत १,४४१ मिलिमीटर एवढा पाऊस पडल्याने, येथील विहिरी, तलाव, नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे, शेतामध्यही खूपसे पाणी साचले आहे. त्यामुळे असे पाणी भातशेतीला आवश्यक असल्याने भातलावणीच्या कामाला वेग प्राप्त झाला आहे.उत्पादित भाताचा येथील शेतकरी संपूर्ण वर्षभर आपल्या कुटुंबासाठी वापर करून, अतिरिक्त उत्पादित भात विकून कुटुंबाचे पालनपोषण करीत असतो. येथे एका दिवसात १५४ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. शेतीसाठी माणसे अपुरी पडली, तर मजुरीवर माणसे घेऊन सध्या लावणीची कामे जलद गतीने पूर्ण होताना दिसत आहेत. किसान क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीधर जंजिरकर यांनी तालुक्यातील ८० टक्के भातलावणी पूर्ण झाली असल्याचे सांगितले.भाताच्या पिकासाठी विमा हप्ता : १० गुंठ्यासाठी ९१ रुपये, एकरी ३६४ रु., तर हेक्टरी ९१० रुपये असून, हेक्टरी ४५,५०० रु पये विमा संरक्षण दिले जाणार आहे. नाचणी पिकाच्या १० गुंठ्यांसाठी विमाहप्ता ४० रुपये, एकरी १६० रुपये व हेक्टरी ४०० रुपये असून, विम्याचे संरक्षण हेक्टरी २०,००० रुपये आहे. या विमा योजनेची माहिती कृषी सहायकांमार्फत गावोगावी देण्यात येत असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे विश्वनाथ अहिरे यांनी सांगितले.शेतकºयांना आवाहनभात व नागली पीक घेणाºया शेतकºयांना ऐच्छिक कुळानेवा भाडेपट्टीने शेती कसणाºयांवर पेरणी ते काढणीदरम्यान नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास पंतप्रधान पीकविमा योजनेचे संरक्षण प्राप्त करण्यासाठी सरकारी सेवा केंद्रावर आवेदन पत्रे येत्या ३१ जुलैपर्यंतसादर करून लाभ घेण्याचे आवाहन मुरुड तालुकाकृषी अधिकारी विश्वनाथ आहिरे यांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड