शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

कर्जतमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ७२ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 02:39 IST

कर्जत तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण, दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवते. मार्च महिना सुरू झाल्याने टंचाईच्या झळा आदिवासी भागात तीव्र होत आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण, दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवते. मार्च महिना सुरू झाल्याने टंचाईच्या झळा आदिवासी भागात तीव्र होत आहेत. यंदा पाणीटंचाई कृती आराखड्यात ३९ गावे आणि ५७ आदिवासीवाड्यांचा समावेश असून, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आणि विंधण विहीर खोदण्यासाठी ७२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.तालुक्यात ५००० मिली पाऊस पडूनदेखील पाणी साठवणुकीच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. तालुक्यातून वाहणाऱ्या तीन प्रमुख नद्यांपैकी दोन उन्हाळ्यात कोरड्या पडतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मार्च महिन्यापासूनच जाणवू लागते. पाणीटंचाईमुळे ग्रामीण, दुर्गम भागातील नागरिकांना भटकंती करावी लागते. यामध्ये विशेषत: महिलांचे हाल होतात. दरवर्षी शासनाकडून टंचाईग्रस्त गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येतो. डिसेंबर २०१८ मध्ये आमदार सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार अविनाश कोष्टी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी, पाणीपुरवठा उपअभियंता आर. डी. कांबळेआदी मान्यवर यावेळी उपस्थितहोते.तालुक्यातील नळपाणी योजना यांची सद्यस्थिती आणि प्रगतिपथावर असलेल्या नळपाणी योजना यांची माहिती घेण्यात येऊन त्याआधारे कर्जत तालुका पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात तालुक्यातील ३९ गावांना आणि ५७ आदिवासीवाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याच वेळी पाणीटंचाई कृती आराखड्यात विंधण विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गतवर्षी कर्जत तालुक्यात चार शासकीय टँकरच्या माध्यमातून सहा गावे आणि २४ आदिवासीवाड्यांत पाणी पुरविण्यात आले होते, तर अनेक गावांत ग्रामपंचायत स्तरावरून टँकर पुरविले गेले होते.पाणीटंचाई कृती आराखड्यात समावेश असलेल्या गावे आणि वाड्यांतील टँकरची मागणी करणारे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करून टँकर सुरू केले जातील. गतवर्षी मागणी केली त्यांना टँकरचे पाणी पुरविले आहे.- अविनाश कोष्टी,तहसीलदार, कर्जत

टॅग्स :Waterपाणी