शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

पेणमध्ये ६.५० लाखांच्या वर रोपांची होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:15 IST

लगबग सुरू : रामवाडी येथील रोपवाटिकेमध्ये अडीच लाख रोपांची निर्मिती

दत्ता म्हात्रेपेण : जागतिक पातळीवर तापमानवाढीमुळे होणाऱ्या बदलाचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. एकीकडे डोक्यावरील ऊन प्रचंड तापत आहे, तर दुसरीकडे वृक्षांअभावी सावली शोधायला जायचे कुठे? हा प्रश्न सतावत आहे. दररोज वाढत्या प्रदूषणामुळे श्वास गुदमरू लागलेला असून त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हरवलेली हिरवळ उजाड माळरानावर पुन्हा नव्याने निर्माण करू, या संकल्पनेतून विविध शासकीय कार्यालयामार्फत तब्बल ६.५० लाखांच्या वर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्या अनुषंगाने सामाजिक वनिकरण विभागाच्या रामवाडी येथील रोपवाटिकेमध्ये अडीच लाख रोपांची निर्मिती करण्यात आली असल्याचे रोपवाटिकामधील अधिकारीवर्गाने सांगितले.

पेणमध्ये यावर्षी सुमारे पाच लाख वृक्षलागवडीचा संकल्प महाराष्टÑ राजवटीच्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने नजरेसमोर विविध शासकीय कार्यालयाने ठेवलेला आहे. यानुसार पेण वनक्षेत्र विभागाने दोन लाख वृक्षलागवडीचा संकल्प पेण वनक्षेत्रातील मोकळ्या जागांवर केलेला आहे. त्याची पूर्वतयारी सध्या जोरदार सुरू असल्याचे वनक्षेत्रपाल गायकवाड यांनी सांगितले. दुसरीकडे पेणच्या सामाजिक वनिकरण विभाग दोन लाख २० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, या विभागाची अडीच लाख विविध प्रकारची रोपे त्यांच्या रोपवाटिकांमध्ये लागवडीसाठी सज्ज झाली असल्याचे वनअधिकारी म्हात्रे यांनी सांगितले. पेण पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ६२ ग्रामपंचायतींना प्रत्येकी तीन हजार २५० या प्रमाणे एकूण दोन लाख ११ हजार २५० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, असे गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी कृषी विभागामार्फत माहिती घेऊन सांगितले. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व विविध सामाजिक संस्था तसेच निमशासकीय कार्यालय हेसुद्धा वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होणार आहेत.

झाडांची संख्या कमी झाल्याने प्रदूषणात वाढमहाराष्ट्र राज्यात २०१० मध्ये सात लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर वृक्ष आच्छादन होते. हे राज्याच्या एकूण भूभागाच्या २.३ टक्के इतके होते. २०१७ मध्ये यामधील ८०४ हेक्टर क्षेत्रावरील वृक्ष आच्छादन नष्ट झाले. परिणामस्वरूप ७०.८ किलो टन कार्बन डायआॅक्साइडच्या उत्सर्जनास चालना मिळाली.

यामुळे प्रदूषणात वाढ होऊन प्रदूषणाचा निर्देशांक वाढला. सन २००१ ते २०१७ या कालावधीत १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील वृक्ष आच्छादनाची हिरवळ नष्ट पावली आहे. ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या ताज्या अहवालात देशासहित राज्यातील हरवलेल्या हिरवळीचा उल्लेख करून त्यावर अहवालात नेमके बोट ठेवण्यात आलेले आहे.

दरवर्षी साजरा होणारा जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने हिरवळ पुन्हा नव्याने निर्माण करणे मानवाच्या संस्कृतीच्या हिताचे आहेच. सजीव सृष्टीचे रक्षण करण्यासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे संरक्षण ही संकल्पना सध्या चांगलीच जोर धरू लागली आहे.