शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जैवविविधतेच्या जतनासाठी ६२ मुले सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:53 IST

जैवविविधतेच्या बाबतीत ‘पश्चिम घाट’ आघाडीवर आहे. देशाच्या सहा राज्यांत पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी

जयंत धुळप  अलिबाग : जैवविविधतेच्या बाबतीत ‘पश्चिम घाट’ आघाडीवर आहे. देशाच्या सहा राज्यांत पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटके विमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी समूह राहतात. त्यांचे संवर्धन करून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, या हेतूने महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांतील आदिवासी मुले वारसा जतनाकरिता सज्ज झाल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी दिली आहे.जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील अशा पश्चिम घाटात कोकणातील सिंधुदुर्ग व रायगड येथील अनेक आदिवासी व बिगरआदिवासी गाव समूहांचा समावेश आहे. पश्चिम घाटातील खाणी, अभयारण्याच्या सभोवताली झालेली वृक्षतोड, परंपरागत जंगलनिवासींची बदललेली शेती पद्धती व वन्य प्राण्यांची शिकार या सारख्या अनेक बाबींमुळे पश्चिम घाटातील नैसर्गिक संतुलन वेगाने ढासळत आहे. याचा विपरित परिणाम म्हणून भूस्सखलन, महापूर, अतिवृष्टी तसेच दुष्काळ आदीसारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.कर्नाटक राज्यातील होश्यागडी येथील जंगलात ‘पश्चिम घाट वाचवा’ या अभियानामार्फत २५ ते २९ एप्रिल दरम्यान किशोरवयीन मुला-मुलींचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात एन्वायरमेंटल स्टडी सेंटर व प्रकृती या दोन संस्थांच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.कोकणातील१६ मुले सक्रियकोकणातून अंकुर ट्रस्ट या संस्थेमार्फत आदिवासी, धनगर तर चाइल्ड हेवन येथील निराश्रीत मुले, असे एकूण १६ किशोरवयीन मुलांचा चमू व कर्मचारी सनीश म्हात्रे, संजय नाईक तसेच गटप्रमुख ईला गोरे व गार्गी पाटील आदी सहभागी झाले होते. कर्नाटकातल्या या प्रशिक्षित मुलांनी घेतलेल्या प्रशिक्षणाबाबत संपूर्ण माहिती येथे देऊन, हा जैवविविधतेचा वारसा जतन करण्याकरिता सक्रिय होण्याचा मानस व्यक्त केला असल्याचे डॉ. वैशाली पाटील यांनी सांगीतले.६२ आदिवासी मुलांचे नेटवर्क वृद्धिंगत करणारपश्चिम घाट वाचवा या अभियानातील आपले भावी संकल्प देखील या मुलांनी तयार केले असून महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यातील या ६२ आदिवासी मुलांचे नेटवर्क अधिक वृद्धिंगत करण्याचा त्यांचा संकल्प महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. पाटील यांनी अखेरीस सांगितले.