शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६७० शाळांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 04:57 IST

शाळांतील पटसंख्या वाढावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बहुतांश शाळा डिजिटलाइज्ड करण्यात आल्या आहेत, तर काही शाळांमध्ये यंदा उन्हाळी सुट्टीमध्ये ‘समरकॅम्प’चे आयोजन करण्यात आले, तसेच ‘नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधीअलिबाग : शाळांतील पटसंख्या वाढावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बहुतांश शाळा डिजिटलाइज्ड करण्यात आल्या आहेत, तर काही शाळांमध्ये यंदा उन्हाळी सुट्टीमध्ये ‘समरकॅम्प’चे आयोजन करण्यात आले, तसेच ‘नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे पटसंख्या वाढली असली तरी जिल्हा परिषदेच्या ६७० शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के शाळांच्या इमारती किमान ५० वर्षे जुन्या आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी त्या वापरात नसल्याने वर्गखोल्यांची दुरवस्था झाली असून, दुरुस्तीकरिता सुमारे ६ कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे.एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे शाळांची अवस्था पाहून आपला पाल्य याठिकाणी सुरक्षित शिक्षण घेईल की नाही, असा प्रश्न पालकांना सतावत आहे. शाळा दुरुस्तीसाठी अपेक्षित असलेला सहा कोटींचा निधी मिळवणे ग्रामीण शिक्षण प्रक्रियेत अडचणीचे ठरत आहे. या शाळांची दुरुस्ती लवकरात लवकर झाली नाही तर एकूण शाळांपैकी २० टक्के शाळा वापरायोग्य राहणार नाहीत. बहुतांश शाळा ५० वर्षे जुन्या असून कित्येक वर्षांत रंगरंगोटी, देखभाल दुरुस्ती झालेली नाही. शाळेच्या इमारतींमध्ये पूर्वी पाच ते सहा वर्गखोल्या वापरात होत्या. मात्र, पटसंख्या कमी झाल्याने आता दोन वा तीन वर्गखोल्याच वापरात आहेत. बंद वर्गखोल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने गळती, भिंतीची पडझड यामुळे मुलांना बसण्याकरिता वर्गखोल्या धोक्याच्या झाल्या आहेत.माणगाव तालुक्यात सर्वाधिक९१ शाळांचे दुरुस्ती प्रस्तावरायगड जिल्हा परिषदेच्या ६७० शाळांच्या दुरुस्ती प्रस्तावांपैकी सर्वाधिक शाळा दुरु स्तीचे ९१ प्रस्ताव माणगाव तालुक्यातील आहेत. उर्वरित तालुक्यांत महाड -८४, पेण - ६८, सुधागड - ५९, पनवेल -५६, म्हसळा-५३, कर्जत -४७, खालापूर-३८, श्रीवर्धन-३७, तळा-३३, अलिबाग-३०, मुरु ड-२९,रोहा-२०, उरण-१३ तर पोलादपूर तालुक्यात १२ दुरुस्ती प्रस्ताव आहेत.जेएसडब्ल्यू व्यवस्थापन सकारात्मकजिल्हा परिषदेच्या ६७० शाळांच्या दुरुस्तीच्या कामाकरिता लागणारा निधी जेएसडब्ल्यू कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मिळावा, याकरिता कंपनी व्यवस्थापनाशी बोलणे झाले आहे. या कामाकरिता कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन दिवसांत कंपनीकडे रीतसर प्रस्ताव सादर करणार असल्याचे रायगड जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सांगितले.

टॅग्स :Schoolशाळाnewsबातम्या