शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जिल्ह्यातील ६७० शाळांच्या दुरुस्तीसाठी ६ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 04:57 IST

शाळांतील पटसंख्या वाढावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बहुतांश शाळा डिजिटलाइज्ड करण्यात आल्या आहेत, तर काही शाळांमध्ये यंदा उन्हाळी सुट्टीमध्ये ‘समरकॅम्प’चे आयोजन करण्यात आले, तसेच ‘नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधीअलिबाग : शाळांतील पटसंख्या वाढावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बहुतांश शाळा डिजिटलाइज्ड करण्यात आल्या आहेत, तर काही शाळांमध्ये यंदा उन्हाळी सुट्टीमध्ये ‘समरकॅम्प’चे आयोजन करण्यात आले, तसेच ‘नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे पटसंख्या वाढली असली तरी जिल्हा परिषदेच्या ६७० शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के शाळांच्या इमारती किमान ५० वर्षे जुन्या आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी त्या वापरात नसल्याने वर्गखोल्यांची दुरवस्था झाली असून, दुरुस्तीकरिता सुमारे ६ कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे.एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे शाळांची अवस्था पाहून आपला पाल्य याठिकाणी सुरक्षित शिक्षण घेईल की नाही, असा प्रश्न पालकांना सतावत आहे. शाळा दुरुस्तीसाठी अपेक्षित असलेला सहा कोटींचा निधी मिळवणे ग्रामीण शिक्षण प्रक्रियेत अडचणीचे ठरत आहे. या शाळांची दुरुस्ती लवकरात लवकर झाली नाही तर एकूण शाळांपैकी २० टक्के शाळा वापरायोग्य राहणार नाहीत. बहुतांश शाळा ५० वर्षे जुन्या असून कित्येक वर्षांत रंगरंगोटी, देखभाल दुरुस्ती झालेली नाही. शाळेच्या इमारतींमध्ये पूर्वी पाच ते सहा वर्गखोल्या वापरात होत्या. मात्र, पटसंख्या कमी झाल्याने आता दोन वा तीन वर्गखोल्याच वापरात आहेत. बंद वर्गखोल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने गळती, भिंतीची पडझड यामुळे मुलांना बसण्याकरिता वर्गखोल्या धोक्याच्या झाल्या आहेत.माणगाव तालुक्यात सर्वाधिक९१ शाळांचे दुरुस्ती प्रस्तावरायगड जिल्हा परिषदेच्या ६७० शाळांच्या दुरुस्ती प्रस्तावांपैकी सर्वाधिक शाळा दुरु स्तीचे ९१ प्रस्ताव माणगाव तालुक्यातील आहेत. उर्वरित तालुक्यांत महाड -८४, पेण - ६८, सुधागड - ५९, पनवेल -५६, म्हसळा-५३, कर्जत -४७, खालापूर-३८, श्रीवर्धन-३७, तळा-३३, अलिबाग-३०, मुरु ड-२९,रोहा-२०, उरण-१३ तर पोलादपूर तालुक्यात १२ दुरुस्ती प्रस्ताव आहेत.जेएसडब्ल्यू व्यवस्थापन सकारात्मकजिल्हा परिषदेच्या ६७० शाळांच्या दुरुस्तीच्या कामाकरिता लागणारा निधी जेएसडब्ल्यू कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मिळावा, याकरिता कंपनी व्यवस्थापनाशी बोलणे झाले आहे. या कामाकरिता कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन दिवसांत कंपनीकडे रीतसर प्रस्ताव सादर करणार असल्याचे रायगड जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सांगितले.

टॅग्स :Schoolशाळाnewsबातम्या