शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

रायगडात ५५ हजार कोटीची उद्योग गुंतवणूक; ६० हजार रोजगार निर्मिती होणार

By राजेश भोस्तेकर | Updated: October 31, 2022 18:48 IST

अलिबाग, मुरुड मध्ये उभारणार चार प्रकल्प, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बेरोजगार तरुणासाठी आनंदाची बातमी असून उद्योग विभागाकडून जिल्ह्यात पंचावन्न हजार कोटीची गुंतवणूक होणारे उद्योग उभारले जाणार आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून प्रत्यक्षात पन्नास हजार बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. तर अप्रत्यक्षपणे पंधरा हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. विरोधक उद्योगाबाबत करत असलेल्या भूलथापांना तरुणांनी बळी पडू नका असेही पालकमंत्री सामंत म्हणाले आहेत. 

रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच पालकमंत्री यांचा जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पालकमंत्री उदय सामंत याच्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यात होणाऱ्या उद्योगाबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर उपस्थित होते. 

रायगड जिल्हात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. नवे प्रकल्प आल्याने स्थानिकांना रोजगार आणि परिसराचा विकासही साधला जातो. जिल्ह्यात चार नवे उद्योग प्रकल्प उभारले जाणार असून त्यामुळे स्थानिकांना रोजगार संधी प्राप्त होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सागितले. जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात तीन तर रोहा मुरुड तालुक्यात एक असे चार मोठे उद्योग प्रकल्प काही दिवसात उभे राहणार आहेत. अलिबागमध्ये जेएसडब्लू न्यू एनर्जी प्रा लि. हा ४ हजार २०० कोटीचा प्रकल्प होणार आहे. उद्योग विभागाकडून एम आय यू झाला असून याद्वारे ३ हजार २०० रोजगार उपलब्ध होणार आहेत. इंडोनेशिया येथील सिदारामस हा २० हजार कोटीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पात प्रत्यक्ष ३ हजार रोजगार उपलब्ध होणार असून दहा हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

अलिबाग धेरंड येथे युएलपी हा प्रकल्प २५० एकर एमआयडीसी जागेवर उभा राहणार आहे. रोहा मुरुड याठिकाणी राज्य सरकार अंतर्गत ३० हजार कोटीची गुंतवणूक असणारा बल्क औषध निर्मित प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पात तीस ते चाळीस हजार रोजगार निर्मिती होणार आहे. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे भविष्यात अलिबाग, मुरुड तालुक्यात प्रकल्पाचे जाळे पसरले जाणार असून पंचावन्न हजार कोटीची गुंतवणूक होऊन साठ ते पासष्ट हजार रोजगार निर्माण होणार आहेत. 

तर बेरोजगारी दूर होणार

नवे प्रकल्प येण्याआधी स्थानिकांना रोजगार दिला जाईल असे बोलले जाते. मात्र प्रत्यक्षात स्थानिक हे बेरोजगार राहत असतात. येणाऱ्या प्रकल्पात लागणाऱ्या ट्रेडचे शिक्षण आधीच कंपनी मार्फत मिळाले तर स्थानिकच नोकरीला लागू शकतो. याबाबत उद्योग विभागाकडून पॉलिसी तयार केली जात आहे. असा पॅटर्न राबविला गेला तर स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला जाणार असल्याची खात्री पालकमंत्री यांनी बोलून दाखवली.

मेडिकल डिव्हाईस पार्क ही राज्य सरकार उभारणार

संभाजीनगर येथे उभारला जाणार मेडिकल डिव्हाईस पार्क हा केंद्राच्या योजनेत शंभर कोटी मिळणार होते मात्र त्यात बसलो नाही हा निर्णय झाला आहे. तो परत गेलेला नाही. मेडिकल डिव्हाईस पार्क हा राज्य शासनामार्फत केला जाणार असल्याचे सामंत यांनी माहिती दिली आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत