शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यामध्ये ५३ कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:19 IST

कुपोषणाचा विळखा एका कर्जत तालुक्याला नाही तर रायगड जिल्ह्यातील महाड, म्हसळा या तालुक्यांत देखील आहे.

कर्जत : कुपोषणाचा विळखा एका कर्जत तालुक्याला नाही तर रायगड जिल्ह्यातील महाड, म्हसळा या तालुक्यांत देखील आहे. जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १५ तालुक्यांत १९६ अतिकुपोषित बालके आढळली आहेत. एकट्या कर्जत तालुक्यात अतिकुपोषित बालकांपैकी ५३ बालके आहेत.२० आॅक्टोबर रोजी कर्जत तालुक्यात कुपोषित बालकाच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेने अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार घेत असलेल्या बालकांचे वजन तपासले, तसेच उंची घेतली. आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या कुपोषित बालकांची यादी पाहिल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या सर्व भागात कमी अधिक प्रमाणात कुपोषित बालके आढळली आहेत. प्रशासन सॅम आणि मॅम म्हणजे अतिकुपोषित आणि तीव्र कुपोषित अशी गटवारी कुपोषित बालकांची करीत असते. यापूर्वीच्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यात १७५ अतिकुपोषित आणि ८४२ तीव्र कुपोषित बालके होती. त्यात वाढ झालेली दिसून येत असून हा सर्व्हे केवळ अंगणवाडी केंद्रावर येत असलेल्या बालकांचा केला गेला आहे. त्या सर्वेक्षणात अंगणवाडी केंद्रावर न येणारी असंख्य बालके असून, त्यांची तपासणी यात अंतर्भूत नसते. तसेच सर्व शहरी भागात अंगणवाड्या नसल्याने हे सर्वेक्षण प्रामुख्याने ग्रामीण भागात राहणाºया बालकांचे आहे हे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत असलेल्या ३२८३ अंगणवाडी केंद्रावरील बालकांची तपासणी करून हे सर्वेक्षण तयार केले आहे. सर्वेक्षण करताना साधारण दीड लाख बालकांची उंची मोजण्यात आली असून, वयानुसार वजन देखील मोजण्यात येऊन हा सर्व्हे करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासन जो सकस असा सूक्ष्म पोषक तत्त्वविरहित आहार असलेली पाकिटे प्रत्येक बालकांना महिन्याला दोन या प्रमाणात देत असतो. त्या पाकिटातील सकस आहार ९५ टक्के बालके खात नसल्याचे पोषक हक्क गटाच्या राज्यातील सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यामुळे असा सकस पोषण आहार बंद करून शासनाने कडधान्य स्वरूपात पोषण आहार देण्याची शिफारस केली आहे.महिला बालविकास विभागाचे सर्वेक्षणरायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक अतिकुपोषित बालके कर्जत तालुक्यातील दोन्ही गटांत आढळली आहेत. कर्जत तालुक्यात आज ५३ बालके अतिकुपोषित आहेत, हा आकडा यापूर्वीच्या सर्व अतिकुपोषित बालकांमध्ये जास्त आहे.त्या वेळी तालुक्यात १४६ तीव्र कुपोषित म्हणजे मॅम श्रेणीमधील बालके आहेत. जिल्ह्यात त्या खालोखाल महाड तालुक्यात २३ कुपोषित बालके असून, तेथे ३१८ अंगणवाड्या असून, श्रीवर्धन तालुक्यात देखील कुपोषित बालकांची संख्या मोठी असून, तेथे २४ बालके या यादीत आहेत.म्हसळा हा तसा लोकसंख्येने लहान असलेल्या तालुक्यात देखील कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे. कुपोषणाचा वाढता आलेख लक्षात घेता जिल्ह्यात ६ महिन्यांपासून ३ वर्षांपर्यंत वयोगटातील बालके ही मोठ्या गटातील बालकांपेक्षा अधिक प्रमाणाने कुपोषित असल्याचे दिसून आले आहे. याबद्दल काही सामाजिक संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणात लहान गटातील बालकांना अंगणवाडी केंद्रावर दिला जाणारा आहार हा सकस नसल्याचे आढळून आले आहे.कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात अंगणवाडी केंद्रातील बालकांची आरोग्य तपासणी वेळेवर होत नाही, महिला बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका या दर महिन्याऐवजी तीन-चार महिन्यांतून एकदा अंगणवाडी केंद्रावर पोहचतात. असे प्रकार वारंवार होत असल्याने कर्जत तालुक्यात कुपोषण कमी होत नाही. दुसरीकडे अंगणवाडीमधील बालकांना दिली जाणारी पोषण आहाराची पाकिटे ही बहुतेक ठिकाणी त्या पाकिटातील खाद्य गुरांना टाकले जाते किंवा घरात बाळगलेल्या कोंबड्यांना खाद्य म्हणून टाकले जाते. त्याशिवाय त्या पाकिटातील खाद्य हे नदीमधील मासे पकडण्यासाठी माशांचे खाद्य म्हणून देखील वापरात येत असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. त्यामुळे असा पोषण आहार शासनाने बंद करून त्या ठिकाणी कडधान्यांचा आहार देण्यात यावा अशी सूचना आहे.- सहारा संदीप कोलंबे,सदस्या रायगड जिल्हा परिषद