शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

संरक्षण बंधारा दुरुस्तीसाठी ५०० महिला करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:13 IST

गेली तीन वर्षे पेण तालुक्यातील माचेल-चिर्बी समुद्र संरक्षक बंधारा उधाणामुळे फुटल्यानंतर परिसरातील ११ गावांतील २७०० एकर भातशेतीत खारे पाणी शिरले.

- जयंत धुळपअलिबाग : गेली तीन वर्षे पेण तालुक्यातील माचेल-चिर्बी समुद्र संरक्षक बंधारा उधाणामुळे फुटल्यानंतर परिसरातील ११ गावांतील २७०० एकर भातशेतीत खारे पाणी शिरले. त्यामुळे भातशेती नापीक झाली असून बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात शासन अपयशी ठरले आहे. एक-दोन स्थानिक शेतकरी व जेएसडब्ल्यू कंपनीमुळे २७०० एकर भातशेती नापीक होऊन ५०० च्यावर शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.बाधित ११ गावांतील ५०० शेतकरी महिलांनी फुटलेल्या माचेल-चिर्बी संरक्षक बंधाºयात उभे राहून खारे पाणी रोखण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी निवेदन अकरा गाव जमीन बचाव संघर्ष कृती समितीने रायगडचे उप जिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांना सोमवारी दिल्याची माहिती कष्टकरी महिला आघाडीच्या प्रमुख मंजुळा पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर व खार डोंगर मेहनत आघाडीचे प्रमुख पांडुरंग तुरे यांनी ‘लोकमत’ला दिली.आनंदनगर, देवळी, जुईहब्बास, खारपाले, पाले, म्हैसवाड, ढोबी, जांभेला, माचेला, चिर्बी, खारघाट या अकरा गावांतील महिला शेतकऱ्यांनी भातशेतीमध्ये घुसणारे खारे पाणी रोखण्याकरिता आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात आतापर्यंत शेतीसाठी कोणी आत्मदहन केलेले नाही. मात्र आम्हा अकरा गावांवर शासनाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रसंग ओढावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत विविध शेतकरी संघटनांनी अनेक निवेदने शासनास दिली. शिष्टमंडळांनी मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, पेण प्रांत कार्यालयात बैठका झाल्या, रास्ता रोको आंदोलन व उपोषण आंदोलने केली. त्यावेळी पेण प्रांत कार्यालयाने व खारभूमी खात्याने अनेक आश्वासने दिली, मात्र बंधाºयाची दुरुस्ती झाली नाही.निवासी उप जिल्हाधिका-यांचा सुवर्णमध्यरायगडच्या निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी निवेदन देण्यास आलेल्या महिलांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. खारलॅन्ड विभागास बंधाºयाचे दुरुस्ती काम करण्यास तत्काळ आदेश देण्यात येतील. तसेच गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करण्यात येईल, असा सुवर्णमध्य बैनाडे यांनी काढला.पावसाळ््याला फक्त २५ दिवस राहिलेले आहेत. तोपर्यंत खारभूमी खात्याने काम पूर्ण केले नाही तर २७०० एकरापुढील आणखी १५०० एकर भातशेतीत खारे पाणी घुसण्याचा धोका आहे. परिणामी गडब ते कासूपर्यंतच्या परिसरातील ५००० एकर क्षेत्रात पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड