शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

संरक्षण बंधारा दुरुस्तीसाठी ५०० महिला करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:13 IST

गेली तीन वर्षे पेण तालुक्यातील माचेल-चिर्बी समुद्र संरक्षक बंधारा उधाणामुळे फुटल्यानंतर परिसरातील ११ गावांतील २७०० एकर भातशेतीत खारे पाणी शिरले.

- जयंत धुळपअलिबाग : गेली तीन वर्षे पेण तालुक्यातील माचेल-चिर्बी समुद्र संरक्षक बंधारा उधाणामुळे फुटल्यानंतर परिसरातील ११ गावांतील २७०० एकर भातशेतीत खारे पाणी शिरले. त्यामुळे भातशेती नापीक झाली असून बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात शासन अपयशी ठरले आहे. एक-दोन स्थानिक शेतकरी व जेएसडब्ल्यू कंपनीमुळे २७०० एकर भातशेती नापीक होऊन ५०० च्यावर शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.बाधित ११ गावांतील ५०० शेतकरी महिलांनी फुटलेल्या माचेल-चिर्बी संरक्षक बंधाºयात उभे राहून खारे पाणी रोखण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी निवेदन अकरा गाव जमीन बचाव संघर्ष कृती समितीने रायगडचे उप जिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांना सोमवारी दिल्याची माहिती कष्टकरी महिला आघाडीच्या प्रमुख मंजुळा पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर व खार डोंगर मेहनत आघाडीचे प्रमुख पांडुरंग तुरे यांनी ‘लोकमत’ला दिली.आनंदनगर, देवळी, जुईहब्बास, खारपाले, पाले, म्हैसवाड, ढोबी, जांभेला, माचेला, चिर्बी, खारघाट या अकरा गावांतील महिला शेतकऱ्यांनी भातशेतीमध्ये घुसणारे खारे पाणी रोखण्याकरिता आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात आतापर्यंत शेतीसाठी कोणी आत्मदहन केलेले नाही. मात्र आम्हा अकरा गावांवर शासनाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रसंग ओढावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत विविध शेतकरी संघटनांनी अनेक निवेदने शासनास दिली. शिष्टमंडळांनी मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, पेण प्रांत कार्यालयात बैठका झाल्या, रास्ता रोको आंदोलन व उपोषण आंदोलने केली. त्यावेळी पेण प्रांत कार्यालयाने व खारभूमी खात्याने अनेक आश्वासने दिली, मात्र बंधाºयाची दुरुस्ती झाली नाही.निवासी उप जिल्हाधिका-यांचा सुवर्णमध्यरायगडच्या निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी निवेदन देण्यास आलेल्या महिलांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. खारलॅन्ड विभागास बंधाºयाचे दुरुस्ती काम करण्यास तत्काळ आदेश देण्यात येतील. तसेच गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करण्यात येईल, असा सुवर्णमध्य बैनाडे यांनी काढला.पावसाळ््याला फक्त २५ दिवस राहिलेले आहेत. तोपर्यंत खारभूमी खात्याने काम पूर्ण केले नाही तर २७०० एकरापुढील आणखी १५०० एकर भातशेतीत खारे पाणी घुसण्याचा धोका आहे. परिणामी गडब ते कासूपर्यंतच्या परिसरातील ५००० एकर क्षेत्रात पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड