शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

न्याय हक्कासाठी रायगडमधील ५० हजार आदिवासी आझाद मैदानावर धडक देणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 18:59 IST

वर्षोनुवर्षे रायगडमधील पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या आदिवासींच्या जमिनींचे सातबारा उतारे करण्यात टाळाटाळ केली जात आहे.

मधुकर ठाकूर

उरण : वर्षोनुवर्षे रायगडमधील पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या आदिवासींच्या जमिनींचे सातबारा उतारे करण्यात टाळाटाळ केली जात आहे. मात्र याच आदिवासींच्या दलालामार्फत थेट बिल्डर्स, भांडवलदारांनी विकत घेतलेल्या जमिनींचे विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने तत्काळ सातबारा उतारे तयार केले जात आहेत. आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन फसवणूक होत असल्याने माणगाव येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी कातकरी आदिवासी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यासाठी निवेदन देणार आहेत.त्यानंतरही आदिवासींच्या समस्यांची सोडवणूक न झाल्यास शासनाच्या विरोधात रायगडमधील सुमारे ५० हजार आदिवासींचा आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्धार आदिवासी अधिकार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील आदिवासींचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत.विशेषता वन विभागाच्या दळी जमिनी आदिवासींच्या नावे करण्यात दिरंगाई केली जात आहे.जमिनींचे सातबारा आदिवासींच्या नावावर करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील उरण व पनवेल तालुक्यातील आदिवासींच्या जमिनी काही दलालांनी अंधारात ठेवून आणि अशिक्षितपणाचा फायदा उठवत बिल्डर्स, भांडवलदारांना विकल्या आहेत.पनवेल तालुक्यातील मानघर, खैरवाडी,भिंगारी आणि उरण तालुक्यातील अनेक रानसई,विंधणे, चिर्ले आदी विभागातील आदिवासींची फसवणूक करून विकलेल्या अनेक आदिवासींच्या दळी जमिनी बिल्डर्स, भांडवलदारांच्या नावावर झालेल्या आहेत.बिल्डर्स, भांडवलदारांच्या नावावर झालेल्या जमिनींचे सातबाराही झाले आहेत.

अनेक ठिकाणी तर विविध शासकीय विभागांच्या जागांवर कंटेनर यार्डही उभारण्यात आले आहेत. मात्र एकीकडे बिल्डर्स, भांडवलदारांच्या नावावर  जमिनींचे सातबारा झाले असताना दुसरीकडे आदिवासींच्या नावावर सातबारा उतारे तयार करण्यात दिरंगाई केली जात आहे.उलट पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या उदरनिर्वाहाच्या जमिनीवर येण्या-जाण्यास संबंधित शासकीय विभागांकडून मनाई केली जात आहे. आदिवासींवरच कारवाई केली जात आहे.मात्र विविध शासकीय विभागांच्या जागांवर उभारण्यात आलेल्या एकाही कंटेनर यार्डवर कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप आदिवासी अधिकार संघर्ष समिती सदस्य बी.पी.लांडगे यांनी केला आहे.

आदिवासींच्या हक्कांसाठी वनहक्क कायदा करण्यात आला आहे. आदिवासींना अंधारात ठेवून आणि त्यांच्या अशिक्षितपणाचा व या कायद्याचा सर्वाधिक फायदा बिल्डर्स, भांडवलदार उठवत फसवणूक करत आहेत.यामुळे पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वन जमिनीवर फळ झाडे, भाजीपाल्याचे उत्पन्न घेत असलेल्या तसेच नदी परिसरात मासेमारी करून उपजीविकेवर उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासींचा प्रश्न गहन बनत चालला आहे.याप्रकरणी आदिवासींना न्याय मिळावा यासाठी उरण पनवेल तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.तसेच माणगाव येथे ५ जानेवारी रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी कातकरी आदिवासी एकत्रित येऊन निवेदन देण्यात येणार आहेत.त्यानंतरही आदिवासींच्या समस्यांची सोडवणूक न झाल्यास शासनाच्या विरोधात रायगडमधील सुमारे ५० हजार आदिवासींचा आझाद मैदानावर मोर्चा काढतील असा इशाराही आदिवासी अधिकार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती समितीचे बी.पी.लांडगे यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण