शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

न्याय हक्कासाठी रायगडमधील ५० हजार आदिवासी आझाद मैदानावर धडक देणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 18:59 IST

वर्षोनुवर्षे रायगडमधील पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या आदिवासींच्या जमिनींचे सातबारा उतारे करण्यात टाळाटाळ केली जात आहे.

मधुकर ठाकूर

उरण : वर्षोनुवर्षे रायगडमधील पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या आदिवासींच्या जमिनींचे सातबारा उतारे करण्यात टाळाटाळ केली जात आहे. मात्र याच आदिवासींच्या दलालामार्फत थेट बिल्डर्स, भांडवलदारांनी विकत घेतलेल्या जमिनींचे विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने तत्काळ सातबारा उतारे तयार केले जात आहेत. आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन फसवणूक होत असल्याने माणगाव येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी कातकरी आदिवासी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यासाठी निवेदन देणार आहेत.त्यानंतरही आदिवासींच्या समस्यांची सोडवणूक न झाल्यास शासनाच्या विरोधात रायगडमधील सुमारे ५० हजार आदिवासींचा आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्धार आदिवासी अधिकार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील आदिवासींचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत.विशेषता वन विभागाच्या दळी जमिनी आदिवासींच्या नावे करण्यात दिरंगाई केली जात आहे.जमिनींचे सातबारा आदिवासींच्या नावावर करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील उरण व पनवेल तालुक्यातील आदिवासींच्या जमिनी काही दलालांनी अंधारात ठेवून आणि अशिक्षितपणाचा फायदा उठवत बिल्डर्स, भांडवलदारांना विकल्या आहेत.पनवेल तालुक्यातील मानघर, खैरवाडी,भिंगारी आणि उरण तालुक्यातील अनेक रानसई,विंधणे, चिर्ले आदी विभागातील आदिवासींची फसवणूक करून विकलेल्या अनेक आदिवासींच्या दळी जमिनी बिल्डर्स, भांडवलदारांच्या नावावर झालेल्या आहेत.बिल्डर्स, भांडवलदारांच्या नावावर झालेल्या जमिनींचे सातबाराही झाले आहेत.

अनेक ठिकाणी तर विविध शासकीय विभागांच्या जागांवर कंटेनर यार्डही उभारण्यात आले आहेत. मात्र एकीकडे बिल्डर्स, भांडवलदारांच्या नावावर  जमिनींचे सातबारा झाले असताना दुसरीकडे आदिवासींच्या नावावर सातबारा उतारे तयार करण्यात दिरंगाई केली जात आहे.उलट पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या उदरनिर्वाहाच्या जमिनीवर येण्या-जाण्यास संबंधित शासकीय विभागांकडून मनाई केली जात आहे. आदिवासींवरच कारवाई केली जात आहे.मात्र विविध शासकीय विभागांच्या जागांवर उभारण्यात आलेल्या एकाही कंटेनर यार्डवर कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप आदिवासी अधिकार संघर्ष समिती सदस्य बी.पी.लांडगे यांनी केला आहे.

आदिवासींच्या हक्कांसाठी वनहक्क कायदा करण्यात आला आहे. आदिवासींना अंधारात ठेवून आणि त्यांच्या अशिक्षितपणाचा व या कायद्याचा सर्वाधिक फायदा बिल्डर्स, भांडवलदार उठवत फसवणूक करत आहेत.यामुळे पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वन जमिनीवर फळ झाडे, भाजीपाल्याचे उत्पन्न घेत असलेल्या तसेच नदी परिसरात मासेमारी करून उपजीविकेवर उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासींचा प्रश्न गहन बनत चालला आहे.याप्रकरणी आदिवासींना न्याय मिळावा यासाठी उरण पनवेल तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.तसेच माणगाव येथे ५ जानेवारी रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी कातकरी आदिवासी एकत्रित येऊन निवेदन देण्यात येणार आहेत.त्यानंतरही आदिवासींच्या समस्यांची सोडवणूक न झाल्यास शासनाच्या विरोधात रायगडमधील सुमारे ५० हजार आदिवासींचा आझाद मैदानावर मोर्चा काढतील असा इशाराही आदिवासी अधिकार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती समितीचे बी.पी.लांडगे यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण