शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

आरडीसी बँकेला ५० कोटींचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 03:31 IST

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये ५०.७२ कोटी रुपये इतका ढोबळ नफा मिळविलेला असून २५.९२ कोटी बँकेला निव्वळ नफा झाला आहे.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये ५०.७२ कोटी रुपये इतका ढोबळ नफा मिळविलेला असून २५.९२ कोटी बँकेला निव्वळ नफा झाला आहे.बँकेच्या ग्राहकांनी दाखविलेला विश्वास आणि कायमस्वरूपी बँकेशी ठेवलेले नाते यामुळे दिवसेंदिवस बँक प्रगती करीत असून ग्राहक आणि बँक कर्मचारी यांचे समन्वयाचे नाते हेच बँकेच्या प्रगतीचे खरे गमक आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. बँकेचे उल्लेखनीय कामगिरी करणारे कर्मचारी, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेमध्ये सर्व ठरावांवर चर्चा होऊन सर्व ठराव सर्वसंमतीने मान्य केले. ग्रामीण भागात अधिक बँकेचे जाळेमजबूत करणे, गोडाऊन योजनेचा विस्तार करणे असे नियोजन असल्याचे पाटील यांनी सांगितले. स्वनिधी ३२५ कोटींवरून ५०० कोटींवर नेण्याचा मानस बँकेने आपला स्वनिधी ३२५.६० कोटी रुपये इतक्या मोठ्या प्रमाणावर नेऊन बँकेची आर्थिक स्थिती भक्कम केली आहे. बँकेचा स्वनिधी ५०० कोटींच्या पुढे नेण्यासाठी पुढील दोन वर्षांमध्ये प्रयत्न केले जाणार असून बँकेचा ढोबळ एनपीए शून्य टक्के करण्याचा मानस सुद्धा त्यांनी व्यक्त केला. बँकेमध्ये आजवर १९००.८२ कोटींच्या ठेवी आणि १०४२.९६ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.शेती कर्जवाटपामध्ये लाखापेक्षा अधिक वाटपबँकेने गेल्या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील आणि देशातील बँकांच्या कामगिरीमध्ये आपले यश मिळविताना अनेक पारितोषिके पटकाविली, तसेच जिल्ह्यातील शेतकरीवर्गाला शेती अल्पमुदत कर्जवाटपामध्ये लक्ष्यांकापेक्षा अधिक कर्ज वाटप केले असून कर्जाची वसुली देखील उत्तम प्रकारे केली आहे.बँकेने या वर्षी आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखत अ आॅडिट वर्ग मिळविलेला आहे. या सर्व बाबी जिल्हा मध्यवर्ती बँकेला भूषणावह आहेत, असे आ.पाटील म्हणाले.