शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

रायगडमध्ये ४९९ धोकादायक इमारती; ४८२ घरांना बजावल्या नोटिसा

By निखिल म्हात्रे | Updated: May 17, 2024 09:28 IST

निखिल म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १५ नगरपालिका हद्दीत सद्य:स्थितीत ४९९ धोकादायक इमारती आहेत. त्यातील ४८२ ...

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातील १५ नगरपालिका हद्दीत सद्य:स्थितीत ४९९ धोकादायक इमारती आहेत. त्यातील ४८२ धोकादायक इमारतींना नगरपालिका प्रशासनाने नोटिसा बजाविल्या आहेत. धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रहिवाशांना घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत ४९९ इमारती व घरे पालिकेने धोकादायक घोषित केली आहेत. त्या घरमालकांना पालिकेकडून नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. पनवेल, कर्जत, उरण, महाड नगरपालिका हद्दीत सर्वाधिक धोकादायक इमारती आहेत. २०२४च्या सर्वेक्षणातून हाती लागलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक धोकादायक इमारती व घरे पनवेल पालिका हद्दीत आहेत. पालिकेने २१५ जणांना नोटिसा बजाविल्या आहेत. त्याखालोखाल कर्जतमध्ये १५३ धोकादायक इमारती व घरे आहेत. उरण ६४, मुरुड ४, महाड ११, माथेरान ६ , अलिबाग ९, रोहा ८, श्रीवर्धन ११ व खोपोली ३, म्हसळा ८, पेण ८ अशा एकूण ४९९ पालिका हद्दीत धोकादायक इमारती आहेत.पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊ नये, म्हणून दरवर्षी धोकादायक इमारत खाली करण्यासाठी नगरपालिका कंबर कसते. नगरपालिकेच्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद दिला जात नाही. धोकादायक असलेल्या घरमालकांना नोटिसा पालिकेकडून बजविण्यात आल्या आहेत. अजूनही धोकादायक इमारती कुठे आहेत का, याचे सर्वेक्षण सुरू आहे. २०२३ च्या सर्वेक्षणातून हाती लागलेल्या माहितीनुसार, इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. या इमारत मालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.वारंवार दिल्या नोटिसाधोकादायक इमारतींमुळे कोणतीही आपत्ती निर्माण होऊ नये म्हणून इमारत मालकांना नोटिसा बजावत त्या खाली करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आदेशाची अंमल बजावणी केल्याचे दिसून आलेले नाही. वारंवार नोटिसा देऊन कोणतीही कार्यवाही होत नसेल तर यावर विचारविनिमय होणे आवश्यक आहे.इमारत पडल्यास जबाबदार कोण?महाड दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासन धोकादायक असलेल्या इमारती खाली करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. मात्र, नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना झाली तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उभा राहत आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग