शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिवजयंती दिनी स्पर्शातून त्यांनी अनुभवला रायगडचा देदिप्यमान इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 14:29 IST

45अंध युवक-युवतींनी पायी चढून रायगड किल्ला केला सर

जयंत धुळप

रायगड - रविवारी शिवजयंतीच्या दिवशी राज्यभर ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका आणि जल्लोष सुरु असताना तब्बल ४५ अंध युवक-युवतींनी रायगड पायी चढण्यास प्रारंभ करुन,वाटेतील प्रत्येक पायरी, दगड, माती,बुरुज, देवडय़ा यांना स्पर्श करीत अभेद्य आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाचा साक्षीदार असलेल्या रायगड किल्ल्यास अनूभवून आपल्या थेट ह्रदयात साठवून अनन्य साधारण अशी अनुभूती घेतली.

पुण्यामधील वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वासुदेव सेवा संघाचे अध्यक्ष अजितदादा कृष्ण तुकदेव यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने स्वरगंधार सांस्कृतिक मंचाच्या स्वयंसेवकांच्या सहाय्याने या तब्बल ४५ अंध युवक-युवतींनी शिवजयंतीनिमित्त शिवराजधानी रायगडावर रोपवेने न जाता,  पायी चालत चढून सर करण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात उतरवून आपल्या स्पर्शज्ञानाने रायगडचा चित्तथरारक इतिहास अनुभवला. 

स्वयंसेवकांची कौतुकास्पद कामगीरीअमीत शुक्र , वैभव भोगले, आनंद सुराना, विश्वंभर साबळे, अनिल पितळे, अमिर मुल्ला, वैभव रानवडे, वैभव देसाई, नितीश जाधव, सुहास महाकाळे, सौरभ अत्ने, अपूर्वा तांबोळी, शिवानी स्वामी, गीता काळे या वेद वासुदेव प्रतिष्ठान आणि स्वरगंधार सांस्कृतिक मंचाच्या स्वयंसेवकांनी पुणे येथील अंध तरुण-तरुणींच्या वस्तीगृहातील या ४५ अंध तरूण तरूणींना शिवजयंतीच्या दिवशी हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याची पायी यात्रा घडविण्याची जबाबदारी घेतली. या अंध तरूणांना व तरूणींना रायगड किल्ल्यावरील वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी नेऊन त्या प्रत्येक स्थळांचा इतिहास कथन करून तेथील वास्तुला हाताने स्पर्श करून अनुभवण्याचा भारावणारा आनंद घेण्याची अपूर्व संधी या स्वयंसेवकांनी दिली.

या अंध युवक-युवतींना गडारोहणादरम्यान कोणत्याहीं प्रकारचा त्रस होवू नये याकरिता या स्वयंसेवकांनी सर्व ती काळजी घेवून जय्यत तयारी केली होती. या अंध युवक-युवतींना शिवकाळात घेऊन जाण्याच्या मोहिमेसाठी ग्रुप डायरेक्टर प्रविण पाखरे यांनी विशेष मार्गदर्शन केले. परतीच्या प्रवासामध्ये पोलादपूरमार्गे प्रतापगड दर्शन घेऊन हे 45 अंध युवक-युवतींनी पुन्हा पुण्याला रवाना होण्यापूर्वी दुपारच्या भोजनासाठी लोहारे येथील बालाजी हॉटेल येथे आले असता त्यांच्या या थरारक कामिगरीने भारावलेले रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत भिलारे आणि बालाजी हॉटेलचे मालक जयेश लिंबाचिया यांनी या सर्वांना मोफत भोजन देवून त्यांच्या आंनदात आगळा सहभाग दिला. 

टॅग्स :Raigadरायगड