शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जिल्ह्यातील ४१९ स्मशानभूमींची स्वच्छता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 23:42 IST

वाढदिवस म्हटला की मेजवान्या, पार्ट्यांचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्याचा ट्रेंड हल्ली सर्वत्र पाहायला मिळतो;

अलिबाग : वाढदिवस म्हटला की मेजवान्या, पार्ट्यांचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्याचा ट्रेंड हल्ली सर्वत्र पाहायला मिळतो; परंतु निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांनी रायगड जिल्ह्यातील स्मशानभूमींची स्वच्छता करून वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने अलिबाग आणि पेण तालुक्यातील तब्बल ४१९ स्मशानभूमींतील तीन लाख २१ हजार ९४ चौरसमीटरचा परिसर स्वच्छ करून ८८ हजार ६६ किलो कचरा काढला. याकामी सात हजार दहा सदस्य सहभागी झाले होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी स्वच्छतेचा दिलेला संदेश प्रत्येक नागरिकांनी अंगीकारल्यास आरोग्यदायी जीवन जगता येणार आहे.स्वच्छ भारत अभियान देशभरात मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या अभियानाचा प्रचार मोठ्या प्रमाणात देशभरात झाला. त्यामुळे या अभियानाचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते; परंतु सदरची योजना सुरू होण्याआधीच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अशी समाजोपयोगी कामे केली जात आहेत.गाव, वाड्या, रस्ते, सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँका, पतसंस्था, एसटी स्टॅण्ड परिसर, न्यायालय, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, गड-किल्ले, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्या आहेत. मात्र, स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचा संकल्प पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे.मोठमोठाले शुभेच्छाचे होर्डिंग, पार्ट्या शुभेच्छांचा वर्षाव, अगदीच वाटले तर वृद्धाश्रम अथवा दवाखान्यांमध्ये फळवाटप, गणवेश, शालोपयोगी वस्तूंचे वाटप असे कार्यक्रम करून वाढदिवस साजरे केले जातात.सचिन धर्माधिकारी यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क स्मशानभूमींची स्वच्छताकरण्याचा निर्णय घेऊन अलिबाग तालुक्यातील २७५ आणि पेण तालुक्यातील १४४ स्मशानभूमींची स्वच्छता केली.>३ लाख २१ हजार ९४ चौ.मी.चा परिसर स्वच्छस्वच्छता मोहिमेंतर्गत ३ लाख २१ हजार ९४ चौ.मी. परिसराची स्वच्छता करण्यात आली. तब्बल ८८ हजार ६६ किलो कचरा काढण्यात आल्याची माहिती डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून देण्यात आली.प्रत्येक गावांमध्ये स्मशानभूमी उभारली असून त्यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची संबंधित ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. मात्र, काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी पसरलेली असते, त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून हजारो किलो कचरा गोळा केला.